Solapur News : विठुरायाच्या भक्तांना मोफत प्रसाद मिळणार!

  74

सोलापूर : अठ्ठावीस युग विटेवर उभा असलेल्या विठुरायासाठी एक भेट व्हावी म्हणून भक्त लांबून दर्शनासाठी येतात. टाळ मृदूंगाच्या गजरात वारीसोबत न थकता भाविक पंढरपूरला दर्शनाला येतात. या विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आषाढी वारीपासून करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे.



पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. दर्शन रांगेतून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन व मुख दर्शन घेणाऱ्या भाविकांना विठुरायाचा मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तेथील देवस्थानाकडून भाविकांना बुंदीचा प्रसाद दिला जातो. त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीने भाविकांना मोफत प्रसाद द्यावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.


Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ