Solapur News : विठुरायाच्या भक्तांना मोफत प्रसाद मिळणार!

सोलापूर : अठ्ठावीस युग विटेवर उभा असलेल्या विठुरायासाठी एक भेट व्हावी म्हणून भक्त लांबून दर्शनासाठी येतात. टाळ मृदूंगाच्या गजरात वारीसोबत न थकता भाविक पंढरपूरला दर्शनाला येतात. या विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आषाढी वारीपासून करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे.



पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. दर्शन रांगेतून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन व मुख दर्शन घेणाऱ्या भाविकांना विठुरायाचा मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तेथील देवस्थानाकडून भाविकांना बुंदीचा प्रसाद दिला जातो. त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीने भाविकांना मोफत प्रसाद द्यावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.


Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी