Solapur News : विठुरायाच्या भक्तांना मोफत प्रसाद मिळणार!

सोलापूर : अठ्ठावीस युग विटेवर उभा असलेल्या विठुरायासाठी एक भेट व्हावी म्हणून भक्त लांबून दर्शनासाठी येतात. टाळ मृदूंगाच्या गजरात वारीसोबत न थकता भाविक पंढरपूरला दर्शनाला येतात. या विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आषाढी वारीपासून करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे.



पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. दर्शन रांगेतून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन व मुख दर्शन घेणाऱ्या भाविकांना विठुरायाचा मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तेथील देवस्थानाकडून भाविकांना बुंदीचा प्रसाद दिला जातो. त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीने भाविकांना मोफत प्रसाद द्यावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.


Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार