Rohit Sharma : हिटमॅनला वानखेडेमध्ये मिळणार हक्काचं स्थान!

वानखेडे स्टेडियममधील स्टँडला असणार रोहित शर्माचं नाव


मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्यासह माजी महान भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत. आता या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्माचे नावही जोडले जाणार आहे.


मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आता रोहित शर्माच्या नावावर एक स्टँड असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएने रोहित शर्माच्या स्टँडला नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मंगळवारी १५ एप्रिल रोजी झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, आणखी दोन स्टँडला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि दिग्गज माजी कर्णधार अजित वाडेकर यांचेही नाव देण्यात येणार आहे. 'बैठकीत स्टँडच्या नावाला एकमताने मान्यता मिळाली असल्याचे क्रिकेट संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.



मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या ग्रँड स्टँड लेव्हल ३ ला शरद पवार स्टँड नाव दिले जाईल. तर ग्रँड स्टँड लेव्हल ४ ला अजित वाडेकर स्टँड असे नाव दिले जाईल. दिवेचा पॅव्हेलियन लेव्हल ३ ला रोहित शर्मा स्टँडचे नाव दिले जाणार आहे. २०११ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करणाऱ्या वानखेडेवर आधीपासूनच सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चंट आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गजांच्या नावाचे स्टँड आहेत. लवकरच रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचे अनावरण केले जाणार आहे.

Comments
Add Comment

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी

मुंबई मनपातील संभाव्य घोटाळ्यांवर भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिकेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत संगनमत करून कामे मिळवण्यासाठी घातलेला घाट आणि

मुंबई मनपा मुख्यालयासह कार्यालये, रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : महापालिका मुख्यालयासह इतर इमारतींमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता अत्याधुनिक स्वरुपाच्या डोअर

भेंडीबाजारात पुन्हा फेरीवाल्यांवर होणार कारवाई

मुंबई : महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

'उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा'

मुंबई : “आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक