सिंधुदुर्ग : जे ग्रामस्थ आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांना सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायतीकडून कोणतेही कागदपत्र न देण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. जिल्ह्यात असा ठराव घेणारी कासार्डे ग्रामपंचायत एकमेव ग्रामपंचायत असल्याने या निर्णयाचा सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. सदरचा ठरावासाठी सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते यानी पुढाकार घेतला व नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. यावेळी माजी जि.प.सदस्य संजय देसाई, माजी उपसभापती प्रकाश पारकर, माजी सरपंच संतोष पारकर, तंटामुक्त अध्यक्ष श्रीरंग पाताडे, सर्व पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सध्या वृद्धाश्रमात वाढत असलेली वयोवृद्धांची संख्या पाहता हा निर्णय योग्यचा असल्याने हा ठराव ग्रामस्थांनी एकमुखी संमत केला आहे. त्याचबरोबर कासार्डे गावात व्यवसाय व काम करण्यासाठी येणारे परप्रांतीय फेरीवाले, भाजीपाला, भंगार विक्रेते, चिरेखाण कामगार, सिलिका कामगार यांनीही गावात येऊन व्यवसाय व काम करण्यापूर्वी प्रथम ग्रामपंचायत कासार्डे, पोलीस पाटील यांच्याकडे रितसर नोंदणी करून परवानगी घेतल्यानतंर गावात व्यवसाय व काम करण्याची मुभा राहील अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच वाढती गुन्हेगारी व सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील सर्व घरमालकांनी आपल्याकडे राहत असलेल्या भाडोत्र्यांची माहिती ग्रामपंचायतीकडे जमा करावी असेही सांगण्यात आले असून यामुळे गवातील सुरक्षेसाठी आधीच एक पाऊल ग्रामपंचायतीने घेतल्याने नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. यासाठी कासार्डे ग्रामपंचायतीने घेतलेले निर्णय जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना अनुकरणीय असल्याचे बोलले जात आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…