मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही आहे गुडन्यूज

मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सहापदरी ऐवजी आठपदरी करण्यात येणार असून १०० हेक्टर जागेसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मिसिंग लिंकमधील बोगदे पूर्ण, पूलाचं काम अंतिम टप्प्यात आले आहे.


पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम देखीवेगाने सुरू आहेच. मिसिंग लिंकचे काम अखेरच्या टप्प्यात असताना दुसऱ्या बाजूला द्रुतगती महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सहा पदरीऐवजी आठपदरी करण्यात येणार आहे. सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या आठ पदरीकरणासाठी १०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढणार आहे.


पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरून दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये- जा करतात. सद्यस्थितीत द्रुतगती महामार्ग सहापदरी आहे, वाहनांची वाढती संख्या पाहाता महामार्ग ८ पदरी करण्यात येणार आहे. पुणे- मुंबई एक्सप्रेस वे हा ९४ किलोमीटर लांबीचा आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे.


खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत ८ पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे उर्से टोल नाक्यापासून पुढे एक्सप्रेस वे आठपदरी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्ग सलग आठपदरी होऊन प्रवास विनाअडथळा वेगाने होणार आहे. सद्यस्थितीत याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत