Chhava Film : चित्रपटात काम करणारा कलाकारच म्हणतोय, 'छावा चित्रपट वाईट'

मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाने २०२५ मध्ये सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्या सीनसाठी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता तो सीन काढून टाकल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकाराने समाज माध्यमांवर पोस्ट करत छावा चित्रपट वाईट असल्याचं म्हटलं आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, छावा या चित्रपटाने अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन हिट झाल्यावर हा सिनेमा तामिळ भाषेतही प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमाने केवळ भारतात ६०० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. या चित्रपटाने काहींच्या मनावर राज्य केले तर काही अंशी प्रेक्षकांना हा सिनेमा खटकला असल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. मराठी कलाकार आस्ताद काळे याने या चित्रपटात 'सूर्या' ही भूमिका साकारली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर जवळपास २ महिन्यांनी आस्तादने फेसबुक पोस्ट शेअर करत या सिनेमातील खटकलेले मुद्दे उपस्थित केले आहेत.


अभिनेत्याने एकूण ५ पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये आस्तादने “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं? काय पुरावे आहेत याचे? मी आता खरं बोलणार आहे…छावा वाईट फिल्म आहे, फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी प्रॉब्लेमॅटिक आहे. सर्वतोपरी वाईट आहे.” अभिनेता पुढे लिहितो, “औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता, तो या वेगाने चालू शकेल? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायत? आणि ते खातायत? हे कसं चालतं?” असे मुद्दे या पोस्टद्वारे आस्तादने उपस्थित केले आहेत. दरम्यान आस्तादच्या या पोस्ट नंतर नवा वाद उफाळणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

Casting Yard Accident : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Nails Free Tree : मुंबईतील १०७१ झाडे काँक्रीटमुक्त, झाडांवरील ५० किलो खिळ्यांच्या वेदनांचा भार केला हलका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळत असून, वृक्ष

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची