Share

बीड प्रकरणाशी तुलना करू नये, आमदार निलेश राणेंचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ मधील खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याने खून केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची होती. तेव्हा तो उबाठा यांच्या पक्षात होता. माजी आमदार वैभव नाईक यांचा तो कार्यकर्ता होता. असे असताना आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासोबत असलेले त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे व बीड मधील संतोष देशमुख खून प्रकरणाशी तुलना करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करण्याचा वैभव नाईकांचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी दिला आहे.

पैशाच्या व्यवहारातून सिद्धेश शिरसाट याने हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी हा खून झाला तेव्हा सिद्धेश शिरसाट हा उबाठा यांच्या शिवसेना पक्षात व माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत मिरवत असतानाचे अनेक फोटो आहेत. या खुनानंतर तो वैभव नाईक यांच्या पक्षाच्या आश्रयाखाली होता व त्यांचेच काम करत होता. त्यामुळे खून झालेल्या व्यक्तीची बॉडी कुठे गायब झाली व त्यावर आरोपीनी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कसा घटनाक्रम राबविला याबाबतची अधिकची माहिती वैभव नाईक यांना माहित असेल.

आपण शिंदे शिवसेनेमध्ये आठ महिन्यापूर्वी प्रवेश केला होता. तो खून दोन वर्षांपूर्वीच झाला होता. त्यामुळे आमच्यावर व आमच्या पक्षावर असे आरोप करताना किंवा त्याबाबतचे राजकारण करताना वैभव नाईक यांनी आपले हसू करून घेऊ नये. त्यांचा बौद्धिक विकास नसल्यामुळे ते हास्यास्पद विधाने करीत आहेत.

यापुढे जरी गाडीखाली कुत्रा आला व मेला तरी तो राणेंच्या गाडीखाली आला व मेला म्हणून वैभव नाईक प्रेस घेऊन माहिती देतील,असेही आमदार निलेश राणे म्हणाले. खरे तर बीड मधील घटना व हा खून यांचा संबंध लावून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करणे या माजी आमदारांना शोभत नाही. यापुढे सिंधूची बदनामी सहन केली जाणार नाही. जिल्ह्याचे नाव खराब होणार नाही याची दक्षता यापुढे त्यांनी घ्यावी.

आमचे नेते शिंदे साहेब, फाटक साहेब यांचे फोटो व्हायरल करून त्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही. वैभव नाईक यांनी आयुष्यभर हेच केले. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधी पदावरून पायउतार व्हावे लागले. राणे कुठे चुकतात याची संधी वैभव नाईक शोधत असतात. पण आरोप करताना आपले कुठे हसू होऊ नये किंवा जिल्ह्याची बदनामी होऊ नये याचे भान त्यांनी ठेवावे असा सल्लाही आमदार निलेश राणे यांनी दिला.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

28 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

29 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

31 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

43 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

47 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago