कुडाळमधील खून प्रकरणातील आरोपी उबाठाचा कार्यकर्ता

बीड प्रकरणाशी तुलना करू नये, आमदार निलेश राणेंचा इशारा


सिंधुदुर्गनगरी : कुडाळ मधील खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याने खून केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची होती. तेव्हा तो उबाठा यांच्या पक्षात होता. माजी आमदार वैभव नाईक यांचा तो कार्यकर्ता होता. असे असताना आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासोबत असलेले त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे व बीड मधील संतोष देशमुख खून प्रकरणाशी तुलना करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करण्याचा वैभव नाईकांचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी दिला आहे.



पैशाच्या व्यवहारातून सिद्धेश शिरसाट याने हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी हा खून झाला तेव्हा सिद्धेश शिरसाट हा उबाठा यांच्या शिवसेना पक्षात व माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत मिरवत असतानाचे अनेक फोटो आहेत. या खुनानंतर तो वैभव नाईक यांच्या पक्षाच्या आश्रयाखाली होता व त्यांचेच काम करत होता. त्यामुळे खून झालेल्या व्यक्तीची बॉडी कुठे गायब झाली व त्यावर आरोपीनी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कसा घटनाक्रम राबविला याबाबतची अधिकची माहिती वैभव नाईक यांना माहित असेल.


आपण शिंदे शिवसेनेमध्ये आठ महिन्यापूर्वी प्रवेश केला होता. तो खून दोन वर्षांपूर्वीच झाला होता. त्यामुळे आमच्यावर व आमच्या पक्षावर असे आरोप करताना किंवा त्याबाबतचे राजकारण करताना वैभव नाईक यांनी आपले हसू करून घेऊ नये. त्यांचा बौद्धिक विकास नसल्यामुळे ते हास्यास्पद विधाने करीत आहेत.


यापुढे जरी गाडीखाली कुत्रा आला व मेला तरी तो राणेंच्या गाडीखाली आला व मेला म्हणून वैभव नाईक प्रेस घेऊन माहिती देतील,असेही आमदार निलेश राणे म्हणाले. खरे तर बीड मधील घटना व हा खून यांचा संबंध लावून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करणे या माजी आमदारांना शोभत नाही. यापुढे सिंधूची बदनामी सहन केली जाणार नाही. जिल्ह्याचे नाव खराब होणार नाही याची दक्षता यापुढे त्यांनी घ्यावी.


आमचे नेते शिंदे साहेब, फाटक साहेब यांचे फोटो व्हायरल करून त्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही. वैभव नाईक यांनी आयुष्यभर हेच केले. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधी पदावरून पायउतार व्हावे लागले. राणे कुठे चुकतात याची संधी वैभव नाईक शोधत असतात. पण आरोप करताना आपले कुठे हसू होऊ नये किंवा जिल्ह्याची बदनामी होऊ नये याचे भान त्यांनी ठेवावे असा सल्लाही आमदार निलेश राणे यांनी दिला.

Comments
Add Comment

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)