दुर्दैवी घटना: पंढरपूरमध्ये कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या मंगलमय वातावरणात विठुरायाच्या पंढरपूरनगरीत एक अत्यंत धक्कादायक घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी आपले जीवन संपवले आहे. पत्नी, दोन मुले आणि पतीने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील रहिवासी म्हमाजी आसबे यांच्या कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली. पती म्हमाजी आसबे (वय अंदाजे 30-35) यांच्या द्राक्षबागेतील विहिरीत त्यांची पत्नी मोनाली आसबे (वय २५), मुलगा कार्तिक (वय ६) आणि मुलगी प्रगती (वय ४) यांनी उडी मारून आत्महत्या केली. पत्नी आणि मुलांनी विहिरीत उडी घेतल्याचे समजल्यानंतर मोठा धक्का बसलेल्या म्हमाजी आसबे यांनी घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आषाढी एकादशीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


घटनेची माहिती मिळताच, पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील पाणी उपसण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. सध्या केवळ चार वर्षांच्या कार्तिकचा मृतदेह सापडला असून, मोनाली आणि प्रगती यांचे मृतदेह शोधण्यासाठी आपत्कालीन यंत्रणांकडून मदत घेतली जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद हेच या सामूहिक आत्महत्येमागचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे कासेगावसह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे