दुर्दैवी घटना: पंढरपूरमध्ये कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या मंगलमय वातावरणात विठुरायाच्या पंढरपूरनगरीत एक अत्यंत धक्कादायक घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी आपले जीवन संपवले आहे. पत्नी, दोन मुले आणि पतीने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील रहिवासी म्हमाजी आसबे यांच्या कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली. पती म्हमाजी आसबे (वय अंदाजे 30-35) यांच्या द्राक्षबागेतील विहिरीत त्यांची पत्नी मोनाली आसबे (वय २५), मुलगा कार्तिक (वय ६) आणि मुलगी प्रगती (वय ४) यांनी उडी मारून आत्महत्या केली. पत्नी आणि मुलांनी विहिरीत उडी घेतल्याचे समजल्यानंतर मोठा धक्का बसलेल्या म्हमाजी आसबे यांनी घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आषाढी एकादशीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


घटनेची माहिती मिळताच, पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील पाणी उपसण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. सध्या केवळ चार वर्षांच्या कार्तिकचा मृतदेह सापडला असून, मोनाली आणि प्रगती यांचे मृतदेह शोधण्यासाठी आपत्कालीन यंत्रणांकडून मदत घेतली जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद हेच या सामूहिक आत्महत्येमागचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे कासेगावसह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक