दुर्दैवी घटना: पंढरपूरमध्ये कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या मंगलमय वातावरणात विठुरायाच्या पंढरपूरनगरीत एक अत्यंत धक्कादायक घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी आपले जीवन संपवले आहे. पत्नी, दोन मुले आणि पतीने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील रहिवासी म्हमाजी आसबे यांच्या कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली. पती म्हमाजी आसबे (वय अंदाजे 30-35) यांच्या द्राक्षबागेतील विहिरीत त्यांची पत्नी मोनाली आसबे (वय २५), मुलगा कार्तिक (वय ६) आणि मुलगी प्रगती (वय ४) यांनी उडी मारून आत्महत्या केली. पत्नी आणि मुलांनी विहिरीत उडी घेतल्याचे समजल्यानंतर मोठा धक्का बसलेल्या म्हमाजी आसबे यांनी घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आषाढी एकादशीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


घटनेची माहिती मिळताच, पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील पाणी उपसण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. सध्या केवळ चार वर्षांच्या कार्तिकचा मृतदेह सापडला असून, मोनाली आणि प्रगती यांचे मृतदेह शोधण्यासाठी आपत्कालीन यंत्रणांकडून मदत घेतली जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद हेच या सामूहिक आत्महत्येमागचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे कासेगावसह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन