Pune News : सलग दुसऱ्या दिवशीही प्रसुती नंतर मृत्यू ; आरोग्य यंत्रणा वेंटीलेटरवर, नक्की चाललंय काय?

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हलगर्जीपणाची बातमी ताजी असतानाच बीड जिल्हा रुग्णालयाचा ढोबळ कारभार समोर आला आहे. बीड जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि १३) एका मातेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. त्यानंतर काल (दि १४) पुन्हा प्रसूतीनंतर आणखी एक माता मृत पावली. या घटनेने जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी एका मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता चौकशीसाठी त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. छाया पांचाळ असं मृत मातेचे नाव होते. या मातेच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याची दखल घेत पाच सदस्य समिती समोर छाया पांचाळ यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या चौकशी समिती समोर जाण्याआधीच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून कागदपत्रे बदलल्याची चर्चा रुग्णालयात सुरू आहे. त्यानंतर काल (दि १४) सकाळी आणखी एका मातेची प्राणजोत मालवली.या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. या घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे याची अधिक चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान या मृत्यूनंतर बीड जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच