Good News : यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक, तब्बल १०५ टक्के पाऊस पडणार!

  80

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी! भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदा देशात मोसमी पाऊस सरासरीपेक्षा १०५ टक्के अधिक पडण्याची शक्यता आहे. एल निनो स्थिती निष्क्रिय असून, पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा, आणि शास्त्रज्ञ आर. के. जेनामणी यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत हा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला.



पावसाचे अंदाजित चित्र




  • जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात १०५% सरासरीहून जास्त पाऊस पडेल.




  • एल निनो अथवा ला निना यापैकी कोणतीही स्थिती सध्या सक्रीय नाही; दोन्ही महासागरांतील स्थिती तटस्थ व पावसाला पोषक आहे.




  • युरोशिया आणि हिमालयातील बर्फाच्छादनही यंदा कमी आहे – जी एक पावसास अनुकूल बाब मानली जाते.




  • गेल्या ५० वर्षांचा सरासरी पाऊस ८७ सेमी असून, यंदा त्यात ५% वाढ होण्याची शक्यता आहे.




कोणत्या भागात काय स्थिती?




  • देशाच्या बहुतांश भागात पावसाची स्थिती अनुकूल असेल.




  • मात्र लडाख, ईशान्य भारत आणि तामिळनाडू या भागात पावसाचे प्रमाण थोडकं राहण्याची शक्यता आहे.




उष्णतेच्या लाटा व दुष्काळाची शक्यता


हवामान विभागाने यासोबतच एप्रिल ते जून या कालावधीत अनेक भागात तीव्र उष्णतेच्या लाटा आणि काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.



शेतीसाठी सकारात्मक संकेत


या अंदाजामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरिपाच्या पिकांची पेरणी आणि उत्पादन दोन्ही वाढण्याची शक्यता असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा सकारात्मक फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

विमानात किंवा हॉस्टेलमध्ये नसूनही चित्रपट निर्मात्याचा विमान अपघातात मृत्यू

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI 171 विमान अपघाताशी संबंधित एक नवी बातमी आली आहे. विमानात किंवा हॉस्टेलमध्ये नसूनही

Ajit Doval: ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पहिल्यांदाच चीनला जाणार

नवी दिल्ली: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी दोघांना अटक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारुन २६

ऑपरेशन सिंधू : आतापर्यंत ८२७ भारतीय मायदेशी परतले

परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल यांनी दिली माहिती नवी दिल्ली : इरणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी

Raja Raghuvanshi Murder Case: सोनम आणि तिच्या प्रियकराला १३ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी

शिलाँग: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात (Raja Raghuvanshi Murder Case) शिलाँग न्यायालयाने शनिवारी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) आणि तिचा

इंडिगोने जाहीर केला मेडे आणि....

बंगळुरू : एअर इंडियाच्या AI 171 या विमानाच्या अपघाताला काही दिवस होत नाहीत तोच इंडिगो या बजेट एअरलाईन कंपनीच्या