ATM In Railway : रेल्वे प्रवासात पैसे घरी विसरलात, नो टेन्शन! आता रेल्वेत मिळणार एटीएमची सुविधा

नाशिक : लांबाचा प्रवास करायचा म्हटला की अनेकजण रेल्वे प्रवासाला (Railway travel) पहिली पसंती देतात. लांब पल्ल्याडचा रेल्वे प्रवास दिड-दोन दिवसांचा देखील होतो. मात्र अनेकदा या प्रवासात घाईगडबडीत पैसे घेण्याचा विसर पडतो. तर कधी पाकिट चोरी देखील होतात. अशावेळी प्रवासादरम्यान पैशांची अडचण निर्माण होत असते. मात्र प्रवाशांची ही अडचण आता दूर होणार आहे. आता रेल्वेत एटीएम मशीनची सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान पैशांची अडचण भासल्यास प्रवाशांना ही सुविधा सोयीची ठरणार आहे. (ATM In Railway)



मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड- मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये ही सुविधा महाराष्ट्र बँकतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. रेल्वेत एका बोगीच्या रिकाम्या जागेमध्ये हे एटीएम उभारण्यात आले आहे. हे मशीन सुरक्षित राहण्यासाठी याला शटर देखील लावण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवासात ज्याला पैशांची गरज आहे, तो वेळीच रक्कम काढू शकणार आहे. हे एटीएम जीपीएस आधारित असेल. यामुळे बहुतेक वेळा एटीएममध्ये नेटवर्क कव्हरेज सुनिश्चित होईल. यासाठी प्रवाशांना कोणताही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही. दरम्यान, या एटीएमची सुरक्षा ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या गार्डची जबाबदारी असेल. (ATM In Railway)





एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


रेल्वे प्रवासादरम्यान अनेक चोरीच्या घटना घडतात. गर्दीचा फायदा घेत तसेच खिडकीतून हात टाकून फोन चोरीच्या घटना रेल्वे प्रवासात सर्रास घडतात. त्यामुळे आता प्रवाशांच्या सोयीसाठी लावलेले एटीएम मशीनबाबतही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. (ATM In Railway)

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी