Salman Khan : कार बॉम्बने उडवून देऊ, सलमान खानला आली नवी धमकी; पोलीस तपास सुरू

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानला उद्देशून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर आली आहे. तसेच सलमानच्या घुसून त्याला बॉम्बने उडवू असंही त्यात म्हटलंय. धमकी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबर सार्वजनिक आहे. या नंबरवर कोणीही तक्रार करू शकते. अनेकदा या नंबरवर स्वतःची ओळख लपवून तक्रारी पाठवल्या जातात. पोलीस सर्व तक्रारींची दखल घेऊन कायद्यानुसार कारवाई करतात. यामुळे सलमानला धमकी देणारा संदेश व्हॉट्सॲपवर येताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सलमानला संरक्षण पुरवणाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगरम्यान सलमानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप झाला. या प्रकरणापासूनच तो बिष्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. काळवीट हा बिष्नोई समुदायाचा अत्यंत प्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीच्या वृत्ताने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं. या घटनेनंतर सलमानने त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावली होती. शिवाय बुलेटप्रूफ कार खरेदी केली आणि वापरायला सुरुवात केली.
Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली