Salman Khan : कार बॉम्बने उडवून देऊ, सलमान खानला आली नवी धमकी; पोलीस तपास सुरू

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानला उद्देशून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर आली आहे. तसेच सलमानच्या घुसून त्याला बॉम्बने उडवू असंही त्यात म्हटलंय. धमकी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबर सार्वजनिक आहे. या नंबरवर कोणीही तक्रार करू शकते. अनेकदा या नंबरवर स्वतःची ओळख लपवून तक्रारी पाठवल्या जातात. पोलीस सर्व तक्रारींची दखल घेऊन कायद्यानुसार कारवाई करतात. यामुळे सलमानला धमकी देणारा संदेश व्हॉट्सॲपवर येताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सलमानला संरक्षण पुरवणाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगरम्यान सलमानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप झाला. या प्रकरणापासूनच तो बिष्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. काळवीट हा बिष्नोई समुदायाचा अत्यंत प्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीच्या वृत्ताने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं. या घटनेनंतर सलमानने त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावली होती. शिवाय बुलेटप्रूफ कार खरेदी केली आणि वापरायला सुरुवात केली.
Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.