Salman Khan : कार बॉम्बने उडवून देऊ, सलमान खानला आली नवी धमकी; पोलीस तपास सुरू

  58

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानला उद्देशून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर आली आहे. तसेच सलमानच्या घुसून त्याला बॉम्बने उडवू असंही त्यात म्हटलंय. धमकी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबर सार्वजनिक आहे. या नंबरवर कोणीही तक्रार करू शकते. अनेकदा या नंबरवर स्वतःची ओळख लपवून तक्रारी पाठवल्या जातात. पोलीस सर्व तक्रारींची दखल घेऊन कायद्यानुसार कारवाई करतात. यामुळे सलमानला धमकी देणारा संदेश व्हॉट्सॲपवर येताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सलमानला संरक्षण पुरवणाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगरम्यान सलमानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप झाला. या प्रकरणापासूनच तो बिष्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. काळवीट हा बिष्नोई समुदायाचा अत्यंत प्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीच्या वृत्ताने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं. या घटनेनंतर सलमानने त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावली होती. शिवाय बुलेटप्रूफ कार खरेदी केली आणि वापरायला सुरुवात केली.
Comments
Add Comment

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५

अखेर कर्नाक पुलाला आता लोकार्पणाची प्रतीक्षा

बुधवारी रात्री उशिरापर्यंत पूल विभागाने फिरवला शेवटचा हात मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर

मनाने, शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल

विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ मुंबई  : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती,