एसटी बसेसमध्ये लागणार जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटन

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात परिवहन मंडळाने महत्तवाचा निर्णय घेतला आहे.स्वारगेट घटनेनंतर एसटीकडून सध्याच्या १२ हजार बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जिपीएस बसवण्यात येणार आहे.याशिवाय एसटी महामंडळाने नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये जीपीएस, पॅनिक बटण आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे


एसटी महामंडळाकडे सध्या उपलब्ध असलेल्या १५ हजार बसेसपैकी ३००० बस पुढील वर्षभरात स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. सुस्थितीतील असलेल्या १२ हजार बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहे आहेत. या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या बसेसमध्ये दोन महिन्यांत प्रत्येकी ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. तसेच त्याचे मॉनिटरिंग गाडीतच असणार आहे. महामंडळाच्या सर्व बसेसना जीपीएस प्रणाली देखील बसवली जाणार आहे. त्यामुळे बसेसचे नेमके लोकेशन समजायला मदत होणार आहे.


यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून देखील निधी मागण्यात आला असून मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन केले जात आहे. एसटी महामंडळाने याआधी कोट्यवधी रुपये खर्च करून १४ हजार बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवली होती.मात्र त्यातील ६००० गाड्यांमधील यंत्रणा निकामी झाली आहे. पडताळणी केल्यानंतर फक्त ८००० बसेसमधील जीपीएस यंत्रणा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता ६००० बसगाड्यांमध्ये पुन्हा नव्याने जीपीएस मशिन बसवावे लागणार आहेत

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,