Railway News : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणार ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावर (Main Line) बुधवार १६ एप्रिलपासून ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या होणार आहेत. याआधी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत होत्या. वाढत्या उकाड्याची दखल घेत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत १४ ने वाढ करण्यात आली आहे.



मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि बेलापूर-उरण कॉरिडॉर, नेरुळ-उरण पोर्ट मार्ग यावरुन दररोज १८१० लोकल फेऱ्या होतात. यात वाढ केलेली नाही. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सामान्य लोकलच्या फेऱ्या १४ ने कमी करुन त्याऐवजी उकाडा असल्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची संख्या १४ ने वाढवली आहे. वातानुकूलित लोकल फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत असतील. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वातानुकूलितऐवजी सामान्य लोकल फेऱ्याच होतील.



सकाळी ७.३४ कल्याण-सीएसएमटी, सकाळी १०.४२ बदलापूर-सीएसएमटी, दुपारी १.२८ ठाणे-सीएसएमटी, दुपारी ३.३६ ठाणे-सीएसएमटी, सायंकाळी ५.४१ ठाणे-सीएसएमटी, रात्री ९.४९ ठाणे-सीएसएमटी, रात्री ११.०४ बदलापूर-ठाणे अशा मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील (अप) लोकल फेऱ्या आता वातानुकूलित अर्थात एसी लोकल फेऱ्या असतील. तसेच मुंबईहून जाणाऱ्या मार्गावरील (डाऊन) सकाळी ६.२६ विद्याविहार ते कल्याण, सकाळी ९.०९ सीएसएमटी ते बदलापूर, दुपारी १२.२४ सीएसएमटी ते ठाणे, दुपारी २.२९ सीएसएमटी-ठाणे, दुपारी ४.३८ सीएसएमटी ते ठाणे, सायंकाळी ६.४५ सीएसएमटी ते ठाणे आणि रात्री ९.०८ सीएसएमटी ते बदलापूर या वातानुकूलित अर्थात एसी लोकल फेऱ्या असतील.
Comments
Add Comment

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची खांदेपालट, कुणाची कुठे बदली, कुणाची कुठे वर्णी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सहायक आयुक्तांची खांदेपालट करून विद्यमान सहायक आयुक्तांची

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को