Railway News : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणार ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावर (Main Line) बुधवार १६ एप्रिलपासून ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या होणार आहेत. याआधी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत होत्या. वाढत्या उकाड्याची दखल घेत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत १४ ने वाढ करण्यात आली आहे.



मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि बेलापूर-उरण कॉरिडॉर, नेरुळ-उरण पोर्ट मार्ग यावरुन दररोज १८१० लोकल फेऱ्या होतात. यात वाढ केलेली नाही. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सामान्य लोकलच्या फेऱ्या १४ ने कमी करुन त्याऐवजी उकाडा असल्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची संख्या १४ ने वाढवली आहे. वातानुकूलित लोकल फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत असतील. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वातानुकूलितऐवजी सामान्य लोकल फेऱ्याच होतील.



सकाळी ७.३४ कल्याण-सीएसएमटी, सकाळी १०.४२ बदलापूर-सीएसएमटी, दुपारी १.२८ ठाणे-सीएसएमटी, दुपारी ३.३६ ठाणे-सीएसएमटी, सायंकाळी ५.४१ ठाणे-सीएसएमटी, रात्री ९.४९ ठाणे-सीएसएमटी, रात्री ११.०४ बदलापूर-ठाणे अशा मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील (अप) लोकल फेऱ्या आता वातानुकूलित अर्थात एसी लोकल फेऱ्या असतील. तसेच मुंबईहून जाणाऱ्या मार्गावरील (डाऊन) सकाळी ६.२६ विद्याविहार ते कल्याण, सकाळी ९.०९ सीएसएमटी ते बदलापूर, दुपारी १२.२४ सीएसएमटी ते ठाणे, दुपारी २.२९ सीएसएमटी-ठाणे, दुपारी ४.३८ सीएसएमटी ते ठाणे, सायंकाळी ६.४५ सीएसएमटी ते ठाणे आणि रात्री ९.०८ सीएसएमटी ते बदलापूर या वातानुकूलित अर्थात एसी लोकल फेऱ्या असतील.
Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास