मराठीला रोजगार आणि जागतिक ओळखीची भाषा बनवणार - मराठी संवर्धनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळ सभागृहात आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीच्या संवर्धनासाठी विश्वकोश निर्मिती, साहित्य संमेलनांचे आयोजन आणि शासकीय व्यवहारात मराठीचा वाढता वापर यांसारख्या ठोस धोरणात्मक पावलांचा त्यांनी उल्लेख केला.


महाराष्ट्र विधानमंडळात झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आशुतोष काळे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन केदार शिंदे, ऋषिकेश जोशी, प्रभू देसाई, धनश्री दामले आणि त्यांच्या टीमने केले.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ही हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा वाहून नेणारी पवित्र धारा आहे. “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी” या ओळींचा उल्लेख करत त्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन केले तसेच संत, कवी, लेखक, अभ्यासक, शिक्षक आणि संशोधक यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. मराठी ही महाराष्ट्राच्या नसा-नसांतून वाहणारी अस्मिता असल्याचे त्यांनी नमूद केले.


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने पाठपुरावा केला, याची आठवण करून देताना शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. मराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून मातृभाषेत शिक्षण आणि अभ्यास यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


मराठी ही व्यवहाराची भाषा म्हणून सर्व क्षेत्रांत प्रभावीपणे वापरली जावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृतींचे इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावेत, मराठीचा वापर प्रशासनात वाढावा आणि ती अर्थार्जनाची भाषा व्हावी, यासाठी धोरणात्मक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. छोट्या-छोट्या प्रयत्नांतून यशाचा महासागर तयार होतो, तसेच मराठीचा महासागर उभा करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


तंत्रज्ञानाच्या युगात मराठीने कालसुसंगत बदल आत्मसात केले असून सोशल मीडियावरही मराठीची विविध रूपे दिसत आहेत. बोलीभाषांचे वैविध्य ही मराठीची ताकद असल्याचे सांगत खानदेशी, मालवणी, कोकणी, वऱ्हाडी आदी बोलीभाषांचा त्यांनी उल्लेख केला. उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करून मराठीची कीर्ती वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.


शासनाच्यावतीने विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करणे, बालकोश, कुमार कोश, ऑलिंपिक कोश निर्मिती तसेच विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर मराठीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील मराठी बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य या संमेलनातून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


विधानमंडळ अधिवेशनाच्या धावपळीत आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या कार्यक्रमातून मराठी विनोदाची परंपरा उजागर झाल्याचे सांगत शिंदे यांनी आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी शैलींचा उल्लेख केला. संकटातही विनोद शोधणारा मराठी माणूस हीच आपली ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.


“माझ्या रक्तात मराठी, माझ्या श्वासात मराठी,” असे भावनिक उद्गार काढत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनी माय मराठीचा वारसा अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकत ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन. याच लोकल ट्रेनमध्ये जेव्हा मारामारी होते, ती सोशल

Food Poisoning : मुंबईत धक्कादायक प्रकार! 'आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं...'; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील