मुंबईतील मिठी नदी, नाले ५० दिवसांत गाळमुक्त होणार

कामात त्रिसूत्री वापरण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सूचना


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नाला तसेच दिवसानिहाय नियोजन करावे, अधिकाऱ्यांनी सतत आपल्या परिसरातील नाल्यांना भेट देऊन कामांचा आढावा घ्यावा. त्याचबरोबर पावसाळ्यातही विविध प्राधिकरणांशी संपर्कात राहावे, अशा सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, २५ मार्चपासून नालेसफाई सुरू झाली असून, आतापर्यंत १२ टक्के गाळ काढण्यात आला आहे.


मुंबईत पावसाळापूर्व कामे सध्या वेगाने सुरू आहेत. मिठी नदीसह शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक पार पडली. प्रत्येक अभियंत्याच्या भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची इत्यंभूत माहिती त्यांना असायलाच हवी, असे आयुक्तांनी नमूद केले.


कामाची सद्यस्थिती, तेथील आकाने, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या आदींबाबत आतापासूनच नियोजन करून त्यावर आताच तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दरम्यान, या कामात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवा. प्रत्येक अभियंत्याने कामांचा टप्पा, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि हातातील कालावधी त्याचबरोबर पंप पुरवणाऱ्या कंत्राटदारांवर देखील कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला. तसेच त्रिसूत्रीचा वापर करून पुढील कामांचे नियोजन करावे, अशा सूचना पालिका आयुक्तांनी मा बैठकीअंतर्गत दिल्या.



'मोबाइल पंप सज्ज ठेवा'


सखल भागामध्ये पाणी उपशासाठी पालिका पंप बसविणार आहे. हे पंप पावसाळ्यात बंद पडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक पंपासाठी सूक्ष्म नियोजन करून तेथे पालिकेचा कर्मचारी तैनात कराया, काही मोबाइल पंग सज्ज ठेवावेत. एखाद्या ठिकाणच्या पंपामध्ये ऐनवेळी बिघाड झाल्यास तेथे नोबाइल पंपाद्वारे पाणी उपसा करावा, पंपामध्ये सातत्याने विघाड झाला, तर इहन्मुंबई महानगरपालिका पंप पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. यंदाच्या पावसाळ्यात जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, हवामान विभागातर्फे जेव्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात येईल, अशावेळी प्रत्येक अधिकाऱ्याने कार्यस्थळी हजर राहावे, असेही आयुक्तांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता