Nagpur Fire : ऍल्युमिनिअम कंपनी स्फोटात ५ जणांचा मृत्यू

उमरेड एमआयडीसीतील एमएमपी इंडस्ट्रीजमधील घटना


नागपूर : नागपूर जिल्याच्या उमरेड एमआयडीसीतील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत ५ कामगारांचा मृत्यू असून ११ कामगार जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. एकूण जखमींपैकी ९ रुग्णांना मेडिकलमध्ये हलवण्यात आले आहे.







यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्याच्या उमरेड एमआयडीसी परिसरात एमएमपी ही अँल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. अँल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. या कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता मोठा स्फोट झाला. यामध्ये ३ कामगारांचा घटनास्थळी आणि दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.


या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना प्रारंभी उपचारासाठी उमरेडच्या खासगी रुग्णालयात व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल केले. कंपनीतील बहुतांश जखमी कामगारांना नागपूर येथे आणण्यात आले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये