Devendra Fadnavis : 'छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…'

किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित विशेष कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या. या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मान्य केल्या.





छत्रपती शिवाजी महाराजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशन करावे अशीही मागणी केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मान्य केल्या.



खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने मागण्या जाहीरपणे केल्या आहेत. पण याआधीच या मागण्यांबाबत राज्य शासन आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सविस्तर चर्चा झाली आहे. महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहे. आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. पण आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. आपल्या देशात अशा गुन्हेगारांवर कायद्यानुसार कारवाई होईल. कायद्यात आणखी कठोर तरतुदी करण्याचं आम्ही ठरवलं आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास तयार करण्याचे काम लवकरच हाती घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.



खासदार उदयनराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या

  1. छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करा. महापुरुषांविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना जामीन देऊ नये.

  2. राज्य सरकारने शिवरायांचा समग्र इतिहास प्रकाशित करावा. महापुरुषांविषयीच्या कलाकृती प्रसिद्ध होण्याआधी त्यांची सेन्सॉर बोर्डाकडून तपासणी करुन घेण्याचे बंधन असावे आणि त्यासाठी तसे सेन्सॉर बोर्ड करावे.

  3. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीत स्मारक उभारावे

  4. शहाजीराजे भोसले यांच्या समाधीसाठी पुरेसा निधी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा.

  5. राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ शिवस्मारक उभारावे

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे