Mumbai News : अखेर मुहूर्त मिळाला! माटुंग्यातील गांधी मार्केटची होणार दुरुस्ती

  30

तब्बल अडीच कोटींचा करणार खर्च


मुंबई : माटुंगा येथील (Matunga) महात्मा गांधी महापालिका मंडईची (Gandhi Market, Matunga) आता मोठ्या स्वरूपातील दुरुस्ती करण्यात येणार असून मागील अनेक महिन्यांपासून या मंडईच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. अखेर या मंडईच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या वतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या मंडईच्या दुरुस्तीचे काम लवकरच महापालिकेच्या (BMC) वतीने हाती घेण्यात येणार असल्याचे कळते.


माटुंगा येथील महापालिकेच्या मालकीच्या महात्मा गांधी महापालिका मंडईच्या पुनर्विकासाची चर्चा असतानाच प्रत्यक्षात पुनर्विकासाअभावी या मंडईची दुरवस्था होत असल्याने बाजार विभागाच्या शिफारशीनुसार महापालिकेच्या या मंडईच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. मंडईची ही इमारत ५० वर्षे जुनी आहे. तळ अधिक एक मजल्याची ही इमारतीच्या काही मुख्य दुरुस्त्या केल्या जाव्यात अशी मागणी केली होती. (Mumbai News)



त्यानुसार महापालिकेच्या वतीने या मंडईच्या दुरुस्तीकरता निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या मुख्य दुरुस्तीच्या कामांसाठी महाकाली कंस्टक्शन या कंपनीची निवड करयात आली असून यासाठी विविध करांसह सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महापालकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मंडईची ही इमारत सी टू प्रवर्गात मोडत असून यासाठी नेमलेल्या एफ के कन्सल्टंट यांनी दिलेल्या अहवालानुसार या मंडईच्या मुख्य दुरुस्त्या केल्या जात आहे. ही दुरुस्ती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून या दुरुस्तीकरता गाळेधारकांचे सहकार्य अपेक्षित आहे. गाळेधारकांच्या सुरक्षेकरताच ही दुरुस्ती केली जात असल्याने यासर्व गाळेधारकांकडून सहकार्य मिळेल अशीही आशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.



मंडईच्या मुख्य दुरुस्त्यांमध्ये या कामांचा समावेश



  • आवश्यकतेनुसार पॉलीमर मॉडीफाईड मॉर्टर ट्रीटमेंट, मायक्रो कॉन्क्रीट, जॅकेटिंग इत्यादी.

  • अंतर्गत तसेच बाह्य भागास आवश्यकतेनुसार सिमेंट गिलाव्याची कामे.

  • गच्चीचे जलभेदीकरण करणे.

  • रंगकाम करणे.

  • प्लंबिंगची व ड्रेनेजची कामे करणे.

  • विद्युत कामे व इतर दुरुस्तीची कामे करणे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.