Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर!

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?


मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी अमित शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानीही जाणार आहेत.यानिमित्ताने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


अमित शाह यांच्या या दौऱ्यामध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा शनिवारी (दि.१२) दुर्गराज रायगडला भेट आणि त्यानंतर मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील समन्वय आणि मतभेद दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपली नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली आहे. भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकलाय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. अमित शाह रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.



दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी अमित शहा शुक्रवारी (दि.११) रात्री पुण्यात दाखल होतील. त्यानंतर शनिवारी (दि.१२) सकाळी त्यांच्या रायगड दौऱ्याला सुरुवात होईल. शनिवारी सकाळी १०.३० वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन आणि त्यानंतर सकाळी ११ वाजता रायगड किल्ल्याला भेट, असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अमित शहा येथील कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी २ वाजता ते सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल होतील. सुनील तटकरे यांच्याकडे दुपारच्या भोजनानंतर ३.३० सुमारास अमित शहा यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईत एका साप्ताहिकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर रात्री ते सह्याद्री अतिथीगृहात पोहचतील.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद