Prashant Koratkar : शिवद्रोही प्रशांत कोरटकर कळंबा तुरुंगातून बाहेर आला; चोख बंदोबस्तात कर्नाटकात सोडणार

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. प्रशांत कोरटकरला दोन दिवसांपुर्वीच जामीन मिळाला होता. त्यानंतर आज तो कळंबा तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र त्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच सुरक्षा मिळणार आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलेही होते. याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नागपूर येथेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता. कोरटकर पाच दिवस पोलीस कोठडीत, तर १० दिवस न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर ३० मार्च रोजी त्याला १४ दिवसांची आणखी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. आणि आज तो कोल्हापूरच्या कळंबा तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातून बाहेर येताच प्रशांत कोरटकरने नागपूरपर्यंत सुरक्षा देण्याची विनंती पोलिसांकडे केली होती. मात्र कोल्हापूर पोलिस त्याला केवळ जिल्ह्याच्या सीमेपर्यंत सुरक्षा देणार आहेत. दरम्यान प्रशांत कोरटकरची जामिनावर सुटका झाल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये