Railway News : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले दाखवणारी विशेष रेल्वे सुरू करणार

  79

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि आसपासची महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे दाखवणारी विशेष रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भातील माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.



छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार आहे. ज्यामध्ये सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे सुरू होईल. यामार्फत दहा दिवसांची टूर केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, जागा, त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना या रेल्वेद्वारे भेट देणे शक्य होणार आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गोंदिया – बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेकरीकरणाकरता ४ हजार ८१९ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. याचा फायदा विदर्भाला तसेच छत्तीसगड आणि तेलंगणालाही होणार आहे. केंद्र सरकार राज्यात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरवर १ लाख ७३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्टेशन्सच्या पुनर्विकासाचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांचं वर्ड क्लास ट्रान्स्फर्मेशन होतंय. यावर्षी २३ हजार ७०० कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये राज्याला मिळाले आहेत. यूपीएच्या दहा वर्षांमध्ये दहा हजार कोटी रुपये एकत्रितपणे मिळाले नाहीत. पण आता महाराष्ट्राला दरवर्षी २३ ते २५ हजार कोटी रुपये फक्त रेल्वेशी संबंधित योजनांकरिता मिळत आहेत.
Comments
Add Comment

प्रहार आरबीआय रेपो दर विश्लेषण: रेपो दर घटला पण अर्थव्यवस्थेचे काय ? वाचा अर्थतज्ज्ञांची मते.....

प्रतिनिधी: आज रेपो दरात घट झाल्यानंतर बाजाराने उत्सव साजरा केला. विशेषतः रेपो दरात ०.५० टक्के अनपेक्षित कपात

Stock Market: रेपो दर कपातीचे बाजाराकडून 'बुल' स्वागत सेन्सेक्सची ८४५ तर निफ्टीची २७४ अंकाने उसळी !

प्रतिनिधी: आरबीआयच्या रेपो दरात कपात करण्याचा निर्णयाचे स्वागत शेअर बाजाराने जोरात सुरू केले आहे. आरबीआयच्या २५

मोठी बातमी RBI News: रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात सर्वसामान्यांचे कर्जाचे होणार स्वस्त,११ महिने पुरेल इतके विदेशी चलनसाठा

प्रतिनिधी: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचे कामगार मंत्र्यांना साकडे

मुंबई : विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे सविस्तर निवेदन महाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या 'गो ग्रीन' उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई :मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश मुंबई:आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या