Railway News : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले दाखवणारी विशेष रेल्वे सुरू करणार

Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि आसपासची महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे दाखवणारी विशेष रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भातील माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार आहे. ज्यामध्ये सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे सुरू होईल. यामार्फत दहा दिवसांची टूर केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, जागा, त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना या रेल्वेद्वारे भेट देणे शक्य होणार आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गोंदिया – बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेकरीकरणाकरता ४ हजार ८१९ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. याचा फायदा विदर्भाला तसेच छत्तीसगड आणि तेलंगणालाही होणार आहे. केंद्र सरकार राज्यात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरवर १ लाख ७३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्टेशन्सच्या पुनर्विकासाचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांचं वर्ड क्लास ट्रान्स्फर्मेशन होतंय. यावर्षी २३ हजार ७०० कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये राज्याला मिळाले आहेत. यूपीएच्या दहा वर्षांमध्ये दहा हजार कोटी रुपये एकत्रितपणे मिळाले नाहीत. पण आता महाराष्ट्राला दरवर्षी २३ ते २५ हजार कोटी रुपये फक्त रेल्वेशी संबंधित योजनांकरिता मिळत आहेत.

Recent Posts

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

3 minutes ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

2 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

2 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

2 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

2 hours ago

हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…

3 hours ago