तहसीलदारपदी लावून देण्याचे आमिष; महिलेस १० लाखांचा गंडा

  46

जळगाव : शहरातील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेची मुलगी तहसीलदार पदावर नोकरीला लागेल, तसेच शासकीय योजनेसाठी अर्ज भरून पैसे मिळतील, अशा आमिषाने एका महिलेची १० लाख ७३ हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदार कल्पना आत्माराम कोळी (५३) यांची आरोपी ज्योती अशोक साळुंखे (रा. मन्यारवाडा, जळगाव) हिच्याशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. पुढे दोघींमध्ये मैत्री झाली. यानंतर साळुंखे यांनी कल्पना कोळी यांना त्यांच्या मुलीला तहसीलदार पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या प्रलोभनाला बळी पडत त्यांनी वेळोवेळी रोख रक्कम व दागिने असे एकूण ७ लाख २२ हजार रुपये दिले.


त्यानंतर शासकीय योजनेसाठी अर्ज भरल्यास प्रति अर्ज १०० रुपये मिळतील, असे सांगून साळुंखे यांनी कोळी यांच्या मुलीकडून ५६० अर्ज भरवून घेतले व त्यातून ३ लाख ५१ हजार ९५० रुपये स्वतःकडे ठेवले. मात्र नोकरी व कोणतीही योजना न मिळाल्यामुळे कोळी यांनी पैसे परत मागितले असता, आरोपीने धमकी दिली आणि पैसे देण्यास नकार दिला. या प्रकारानंतर तक्रारदार कोळी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार ज्योती साळुंखे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक