तहसीलदारपदी लावून देण्याचे आमिष; महिलेस १० लाखांचा गंडा

जळगाव : शहरातील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेची मुलगी तहसीलदार पदावर नोकरीला लागेल, तसेच शासकीय योजनेसाठी अर्ज भरून पैसे मिळतील, अशा आमिषाने एका महिलेची १० लाख ७३ हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदार कल्पना आत्माराम कोळी (५३) यांची आरोपी ज्योती अशोक साळुंखे (रा. मन्यारवाडा, जळगाव) हिच्याशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. पुढे दोघींमध्ये मैत्री झाली. यानंतर साळुंखे यांनी कल्पना कोळी यांना त्यांच्या मुलीला तहसीलदार पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या प्रलोभनाला बळी पडत त्यांनी वेळोवेळी रोख रक्कम व दागिने असे एकूण ७ लाख २२ हजार रुपये दिले.


त्यानंतर शासकीय योजनेसाठी अर्ज भरल्यास प्रति अर्ज १०० रुपये मिळतील, असे सांगून साळुंखे यांनी कोळी यांच्या मुलीकडून ५६० अर्ज भरवून घेतले व त्यातून ३ लाख ५१ हजार ९५० रुपये स्वतःकडे ठेवले. मात्र नोकरी व कोणतीही योजना न मिळाल्यामुळे कोळी यांनी पैसे परत मागितले असता, आरोपीने धमकी दिली आणि पैसे देण्यास नकार दिला. या प्रकारानंतर तक्रारदार कोळी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार ज्योती साळुंखे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला