Pawar : सोशल मीडिया स्ट्रॅटेजी प्लॅनरची मुलगी होणार अजित पवारांची सून

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार याचे लग्न ऋतुजा पाटील सोबत होत आहे. जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द सुरू केली आहे तर ऋतुजा पाटील या सोशल मीडिया स्ट्रॅटेजी प्लॅनरची मुलगी आहेत. ऋतुजा पाटीलचे वडील म्हणजे फलटणचे प्रवीण पाटील. प्रवीण पाटील हे राजकारणी, व्यावसायिक, सेलिब्रेटी आदींसाठी सोशल मीडिया स्ट्रॅटेजी तयार करणारी कंपनी चालवतात. ही कंपनी नाविन्यपूर्ण स्ट्रॅटेजी राबवून क्लाएंटची सोशल मीडिया इमेज तयार करते आणि जपते. तसेच ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांची सून आहे.







जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे लग्न डिसेंबर २०२५ मध्ये होणार आहे, साखरपुडा आज म्हणजे गुरुवार १० एप्रिल रोजी होत आहे. अजित पवारांच्या घोटावड्याच्या फार्महाऊसवर संध्याकाळी साडेपाच वाजता साखरपुडा होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्व मतभेद विसरुन अजित पवारांनी सर्व पवार कुटुंबियांना आमंत्रण दिले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य साखरपुड्याला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. साखरपुड्याला मी, सदानंद सुळे आणि रेवती जाणार आहोत, असे शरद पवार गटाच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले आहे.



याआधी राजकीय मुद्यावरुन शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाले. शरद पवार पुढील पिढीला संधी देत नाहीत, सर्व निर्णय ठराविक नेतेच घेतात, पक्षात लोकशाही उरलेली नाही; अशा स्वरुपाच्या तक्रारी करत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. पुढे बहुसंख्य आमदार आणि खासदार यांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला. नंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या नेतृत्वात कार्यरत आहे तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे जाहीर केले. शरद पवारांच्या नेतृत्वातील गटाला नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे स्वतंत्र नाव देण्यात आले. या राजकीय घडामोडींमुळे पवार कुटुंबात मतभेद सुरू झाल्याची चर्चा जोर धरू लागली. यानंतर आता जय पवारांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने मतभेद विसरुन पवार कुटुंब एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच अनेकांचे लक्ष साखरपुड्याकडे आहे.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये