Pawar : सोशल मीडिया स्ट्रॅटेजी प्लॅनरची मुलगी होणार अजित पवारांची सून

  156

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार याचे लग्न ऋतुजा पाटील सोबत होत आहे. जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द सुरू केली आहे तर ऋतुजा पाटील या सोशल मीडिया स्ट्रॅटेजी प्लॅनरची मुलगी आहेत. ऋतुजा पाटीलचे वडील म्हणजे फलटणचे प्रवीण पाटील. प्रवीण पाटील हे राजकारणी, व्यावसायिक, सेलिब्रेटी आदींसाठी सोशल मीडिया स्ट्रॅटेजी तयार करणारी कंपनी चालवतात. ही कंपनी नाविन्यपूर्ण स्ट्रॅटेजी राबवून क्लाएंटची सोशल मीडिया इमेज तयार करते आणि जपते. तसेच ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांची सून आहे.







जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे लग्न डिसेंबर २०२५ मध्ये होणार आहे, साखरपुडा आज म्हणजे गुरुवार १० एप्रिल रोजी होत आहे. अजित पवारांच्या घोटावड्याच्या फार्महाऊसवर संध्याकाळी साडेपाच वाजता साखरपुडा होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्व मतभेद विसरुन अजित पवारांनी सर्व पवार कुटुंबियांना आमंत्रण दिले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य साखरपुड्याला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. साखरपुड्याला मी, सदानंद सुळे आणि रेवती जाणार आहोत, असे शरद पवार गटाच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले आहे.



याआधी राजकीय मुद्यावरुन शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाले. शरद पवार पुढील पिढीला संधी देत नाहीत, सर्व निर्णय ठराविक नेतेच घेतात, पक्षात लोकशाही उरलेली नाही; अशा स्वरुपाच्या तक्रारी करत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. पुढे बहुसंख्य आमदार आणि खासदार यांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला. नंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या नेतृत्वात कार्यरत आहे तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे जाहीर केले. शरद पवारांच्या नेतृत्वातील गटाला नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे स्वतंत्र नाव देण्यात आले. या राजकीय घडामोडींमुळे पवार कुटुंबात मतभेद सुरू झाल्याची चर्चा जोर धरू लागली. यानंतर आता जय पवारांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने मतभेद विसरुन पवार कुटुंब एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच अनेकांचे लक्ष साखरपुड्याकडे आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला

रुग्णालयातील स्वच्छतेवर चक्क नऊ कोटी खर्च; मनपाचा वैद्यकीय विभाग ठेकेदारांवर मेहेरबान?

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील पाच रुग्णालयांमध्ये साफसफाईच्या कामांसाठी तब्बल नऊ कोटींचा खर्च

वीज ग्राहकांना सरसकट दिलासा; घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीजदरात कपात

मुंबई/नाशिक : राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरविण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र

मनमाडकरांना लवकरच मिळणार रोज पाणी

करंजवण योजना पूर्ण; आ. कांदे यांच्याकडून पाहणी मनमाड : चार दशकांपासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या

ना. भुजबळांच्या आदेशाला ठेकेदारांची ‘मातीची टोपली’

पिंपळस - येवला रस्त्यावरील खड्ड्यांत माती; अपघातांचा वाढला धोका निफाड : पिंपळस ते येवला रस्त्यावर सध्या