Pune News : खर्च परवडतं नाही म्हणून आईने संपवले पोटच्या जुळ्या पोरांचे जीवन

पुणे : पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पुण्यातील एका महिलेने पोटच्या जुळ्या मुलांना खर्च परवडत नसल्याने जीवे मारले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ३५ वर्षीय महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत राहणाऱ्या महिलेला लग्नाला १० वर्षे उलटूनही मुल होत नव्हते. या महिलेने मोठा खर्च करून टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय निवडला. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून त्या माहेरी दत्तनगर थेऊर येथे आल्या होत्या. टेस्ट ट्युब बेबीच्या माध्यमातून त्यांना दोन महिन्यांपूर्वी दोन जुळी मुले झाली. परंतु, त्यांची वाढ योग्यरीत्या होत नव्हती. मुलांची योग्य वाढ होत नसल्याने व त्याचा खर्च परवडत नसल्याने त्या तणावात होत्या. त्यातूनच त्या मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर गेल्या. त्यांनी छतावरील प्लास्टिकच्या टाकीमधील पाण्यात दोन्ही बाळांना बुडविले व स्वत: त्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.



महिलेची धक्कादायक कृती शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बघितली. त्याने महिलेच्या भावाला आणि पोलिसांना कळवलं. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव पोलिसांनी वाचवला मात्र दोन जुळ्या निष्पाप मुलांनी जीव गमावला. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच, लोणीकाळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुले आणि महिलेला बाहेर काढून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेला पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्या अंतर्गत बेड्या ठोकल्या आहेत.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार