Pune News : खर्च परवडतं नाही म्हणून आईने संपवले पोटच्या जुळ्या पोरांचे जीवन

पुणे : पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पुण्यातील एका महिलेने पोटच्या जुळ्या मुलांना खर्च परवडत नसल्याने जीवे मारले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ३५ वर्षीय महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत राहणाऱ्या महिलेला लग्नाला १० वर्षे उलटूनही मुल होत नव्हते. या महिलेने मोठा खर्च करून टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय निवडला. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून त्या माहेरी दत्तनगर थेऊर येथे आल्या होत्या. टेस्ट ट्युब बेबीच्या माध्यमातून त्यांना दोन महिन्यांपूर्वी दोन जुळी मुले झाली. परंतु, त्यांची वाढ योग्यरीत्या होत नव्हती. मुलांची योग्य वाढ होत नसल्याने व त्याचा खर्च परवडत नसल्याने त्या तणावात होत्या. त्यातूनच त्या मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर गेल्या. त्यांनी छतावरील प्लास्टिकच्या टाकीमधील पाण्यात दोन्ही बाळांना बुडविले व स्वत: त्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.



महिलेची धक्कादायक कृती शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बघितली. त्याने महिलेच्या भावाला आणि पोलिसांना कळवलं. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव पोलिसांनी वाचवला मात्र दोन जुळ्या निष्पाप मुलांनी जीव गमावला. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच, लोणीकाळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुले आणि महिलेला बाहेर काढून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेला पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्या अंतर्गत बेड्या ठोकल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ