Pune News : खर्च परवडतं नाही म्हणून आईने संपवले पोटच्या जुळ्या पोरांचे जीवन

  48

पुणे : पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पुण्यातील एका महिलेने पोटच्या जुळ्या मुलांना खर्च परवडत नसल्याने जीवे मारले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ३५ वर्षीय महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत राहणाऱ्या महिलेला लग्नाला १० वर्षे उलटूनही मुल होत नव्हते. या महिलेने मोठा खर्च करून टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय निवडला. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून त्या माहेरी दत्तनगर थेऊर येथे आल्या होत्या. टेस्ट ट्युब बेबीच्या माध्यमातून त्यांना दोन महिन्यांपूर्वी दोन जुळी मुले झाली. परंतु, त्यांची वाढ योग्यरीत्या होत नव्हती. मुलांची योग्य वाढ होत नसल्याने व त्याचा खर्च परवडत नसल्याने त्या तणावात होत्या. त्यातूनच त्या मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर गेल्या. त्यांनी छतावरील प्लास्टिकच्या टाकीमधील पाण्यात दोन्ही बाळांना बुडविले व स्वत: त्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.



महिलेची धक्कादायक कृती शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बघितली. त्याने महिलेच्या भावाला आणि पोलिसांना कळवलं. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव पोलिसांनी वाचवला मात्र दोन जुळ्या निष्पाप मुलांनी जीव गमावला. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच, लोणीकाळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुले आणि महिलेला बाहेर काढून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेला पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्या अंतर्गत बेड्या ठोकल्या आहेत.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून