Chandrashekhar Bawankule : अमरावती-दिल्ली विमानसेवा होणार सुरु - चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती : अमरावती विमानतळावरून येत्या १६ एप्रिलपासून प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे, ही अमरावतीकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर अमरावतीहून पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे, याचा आपल्याला विशेष आनंद आहे. पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मार्ग १६ तारखेला अमरावतीला उघडणार आहे. अमरावती-मुंबई या विमानसेवेनंतर इतर ठिकाणीही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. अमरावती-दिल्ली विमानसेवा देखील सुरू करणार आहोत, असे आश्वासन महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी येथे दिले.


श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे होते. कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके आदी उपस्थित होते.



चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अमरावतीहून आता नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी अमरावतीला येत आहोत. अमरावतीला विमानसेवेची सुविधा आवश्यक होती, ती आता पूर्ण झाली आहे. पश्चिम विदर्भाच्या विकासाचे दार खुले होणार आहे. आपला महाराष्ट्र, विदर्भ विकसित झाला पाहिजे, हे स्वप्न डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बघितले होते. विशेषत: कृषी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, ही त्यांची तळमळ होती.


बावनकुळे म्हणाले, मी देखील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. माझे शिक्षण या संस्थेच्या शाळेतच झाले आहे. माझ्याकडे महसूल विभाग आहे. संस्थेसाठी जमीन देण्यास मी तयार आहे. संस्थेसाठी एकाच ठिकाणी शैक्षणिक संकुल उभारायचे असेल, तर त्यासाठी देखील सरकार मदत करण्यास तयार आहे. या शिक्षण संस्थेला आधुनिक संसाधनांची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली, ती निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह