Amravati Airport : अमरावतीहून १६ एप्रिलला मुंबईसाठी पहिले विमान उड्डाण

  86

अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावतीच्या विमानतळाचे काम आता पूर्ण झाले असून अमरावती विमानतळावरून पहिले विमान उड्डाण करण्यासाठीची तारीख आता निश्चित झाली आहे.अमरावती विमानतळावरून मुंबईसाठीचे पहिले विमान १६ एप्रिलला टेकऑफ करणार असून यासाठीचे सर्व तिकीट बुकिंग फुल्ल झाली आहे. यामुळे अखेर अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे.


बहुप्रतीक्षित असलेल्या अमरावती विमानतळावरून विमान टेकऑफ करण्याचा अखेर मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. यानुसार १६ एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. यामुळे अमरावतीकरांची टेकऑफची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. याठिकाणी अलायन्स एअर लाइनवर विमान प्रवासाची जबाबदारी आहे. तारीख निश्चित झाल्यानंतर काही वेळातच अमरावती- मुंबईची तिकिट बुकिंग फुल्ल झाली आहे. मुंबईसाठी टेकऑफ होण्यापूर्वी १६ तारखेलाच अमरावती विमानतळाचा शानदार पद्धतीने लोकार्पण सोहळा होणार आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे हे लोकार्पण करणार असून अमरावती- मुंबई पहिल्या विमानाने प्रवास करणार आहेत.


पश्चिम विदर्भातील अमरावती शहर हे महत्त्वाचे विभागीय मुख्यालय आहे. मात्र या मुख्यालयातुन विमान सेवा अद्याप सुरू झालेली नव्हती. अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची अमरावती व अकोला, यवतमाळ जिल्हावासियांची होती. त्यानुसार सप्टेंबर २०२३ मध्ये इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीने विमानतळाच्या कामाला सुरुवात केली होती. यानंतर विमानतळाचे काम आता पूर्ण झाले आहे. आणि १६ एप्रिल रोजी पाहिले विमान उड्डाण होणार आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली