Amravati Airport : अमरावतीहून १६ एप्रिलला मुंबईसाठी पहिले विमान उड्डाण

  122

अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावतीच्या विमानतळाचे काम आता पूर्ण झाले असून अमरावती विमानतळावरून पहिले विमान उड्डाण करण्यासाठीची तारीख आता निश्चित झाली आहे.अमरावती विमानतळावरून मुंबईसाठीचे पहिले विमान १६ एप्रिलला टेकऑफ करणार असून यासाठीचे सर्व तिकीट बुकिंग फुल्ल झाली आहे. यामुळे अखेर अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे.


बहुप्रतीक्षित असलेल्या अमरावती विमानतळावरून विमान टेकऑफ करण्याचा अखेर मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. यानुसार १६ एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. यामुळे अमरावतीकरांची टेकऑफची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. याठिकाणी अलायन्स एअर लाइनवर विमान प्रवासाची जबाबदारी आहे. तारीख निश्चित झाल्यानंतर काही वेळातच अमरावती- मुंबईची तिकिट बुकिंग फुल्ल झाली आहे. मुंबईसाठी टेकऑफ होण्यापूर्वी १६ तारखेलाच अमरावती विमानतळाचा शानदार पद्धतीने लोकार्पण सोहळा होणार आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे हे लोकार्पण करणार असून अमरावती- मुंबई पहिल्या विमानाने प्रवास करणार आहेत.


पश्चिम विदर्भातील अमरावती शहर हे महत्त्वाचे विभागीय मुख्यालय आहे. मात्र या मुख्यालयातुन विमान सेवा अद्याप सुरू झालेली नव्हती. अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची अमरावती व अकोला, यवतमाळ जिल्हावासियांची होती. त्यानुसार सप्टेंबर २०२३ मध्ये इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीने विमानतळाच्या कामाला सुरुवात केली होती. यानंतर विमानतळाचे काम आता पूर्ण झाले आहे. आणि १६ एप्रिल रोजी पाहिले विमान उड्डाण होणार आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,