मुंबई : राज्यातील पाच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मंगळवार ८ एप्रिल रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. या रिक्त पदावर हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता मेश्राम यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका अर्थात केडीएमसीच्या आयुक्तपदाची जबाबदारी तीन वर्षे इंदुराणी जाखड यांनी हाताळली. त्यांची एक एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारीपदी बदली झाली. यानंतर रिक्त झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती झाली आहे. इंदुराणी जाखड यांच्या बदलीनंतर आठवड्याभरात केडीएमसीला नवे आयुक्त मिळाले आहेत.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…