भल्या पहाटे गायमुखजवळ ट्रकची बेस्ट बसला धडक! रस्त्यावर काचेचा खच

ठाणे : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात भल्या पहाटे ट्रक आणि मिजी बसचा अपघात झाला. ट्रकचा एक्सेल तुटल्याने चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटले आणि बाजूने जाणाऱ्या मिनी बसला धडकून पलटी झाला. गुजरातवरून हा ट्रक रिकाम्या दारूच्या बाटल्या घेऊन ठाण्याच्या दिशेने येत होता. या अपघातामुळे येथे जड अवजड वाहनांची काही तास कोंडी झाली होती.



गुजरात ते मुंबई अशी वाहतूक करणारा ट्रक (GJ 02 VV 3808) मंगळवारी पहाटे ३:०० च्या सुमारास गायमुख घाटाजवळ वाहतूक चौकीच्या बाजूला पलटला. ट्रकमध्ये असलेल्या दारूच्या काचेच्या रिकाम्या रस्त्यावर पसरल्याने सगळीकडे काचांचा खच पडला होता. जवळच चौकीत असलेले वाहतूक पोलिस जयदत्त मुंढे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवून अपघाताची माहिती अग्निशमन दल आणि ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. लागलीच या विभागांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन हायड्रा मशीन आणि जेसीबीच्या मदतीने पलटी झालेला ट्रक बाजूला केला.


या अपघातात मुलुंड आगाराच्या बसला देखील (MH 01 EM 3914) ट्रकची धडक बसली होती. त्यात बसचे किरकोळ नुकसान झाले. तर ट्रकची बॉडी पूर्णपणे सडल्याने तो बाजूला करण्यासाठी बराच वेळ लागला. सुदैवाने मुलुंड मिरा रोडच्या मार्गावर धावणाऱ्या बेस्टच्या बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी संभाव्य हानी टळली. परंतु बस वाहक (कंडक्टर) हर्षल कासकर, वय ३२ यांच्या एका डोळ्याला दुखापत झाली. काचेचा तुकडा त्यांच्या डोळ्यात गेला. अपघाताच्या घटनेमुळे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सुमारे तीन तास कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीत सापडलेला रस्ता सकाळी ६-७ वाजता मोकळा झाला.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी