पाण्याची बिले स्वीकारणाऱ्या प्रणालीचे सर्व्हर पुढील आठवडा बंद

  40

पाण्याची बिले तसेच त्यावर आधारीत सेवा पूर्णपणे बंद


मुंबई (खास प्रतिनिधी) : 'ॲक्वा' जलआकार प्रणालीच्या सर्व्हरवरील माहिती क्लाऊड सर्व्हरवर स्थानांतरीत करण्याचे कामकाज मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते मंगळवारी १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत जल अभियंता विभागाची 'ॲक्वा' ही जलआकार देयके व संकलन प्रणाली तसेच तिच्यावर आधारित इतर सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.


मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालयांमध्‍ये नागरी सुविधा केंद्रातील जलआकार भरणा, ऑनलाईन जलआकार भरणा तसेच 'ॲक्वा' प्रणालीशी संबंधीत सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच महानगरपालिका संकेतस्थळावरील जलआकार संबंधीत कोणतीही माहिती या कालावधीत उपलब्ध नसेल.


सध्या अस्तित्वात असलेल्या 'ॲक्वा' प्रणालीच्या परिरक्षण व सुधारणेकरीता कामकाज हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपरोक्‍त नमूद कालावधीत 'ॲक्वा' जलआकार देयक व संकलन प्रणाली संपूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत