Mumbai Climate : मुंबईत एप्रिलमध्येच मे-जूनची झळ; ठाणे ४० तर मुंबईत उष्णतेचा तडाखा

  135

मुंबई : एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई आणि उपनगरांमध्ये उन्हाने अक्षरशः कहर केला आहे. सोमवारी मुंबईतील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचले तर ठाण्यात पारा थेट ४० अंशांवर गेला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला आहे.


मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) बहुतांश भागांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून, मुंबई शहराचाही पारा ३६ अंशांवर स्थिरावल्याचे नोंदवण्यात आले आहे. रविवारीच्या तुलनेत तापमानात २ अंशांची वाढ झाली असून ही वाढ पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे झाली आहे, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.



हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत तापमान ४० ते ४१ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून मात्र तापमानात थोडीशी घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र तोपर्यंत शहर उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखालीच राहणार आहे.


या उष्णतेच्या लाटेची सुरुवात फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच झाली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला तापमान ३५ अंशांपर्यंत स्थिर होते. मात्र गेल्या आठवड्यापासून आकाशातील मळभ दूर झाल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम जाणवू लागला आहे. त्यातच समुद्रकाठावरील आर्द्रतेमधील चढउतार आणि समुद्री वाऱ्यांचा अभाव यामुळे मुंबईकरांची तगमग वाढली आहे.


याचवेळी गुजरातमधून वायव्य दिशेने येणाऱ्या गरम वाऱ्यांनीही परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे. या गरम वाऱ्यांचा प्रवाह मुंबईकडे वळला असून, त्यामुळे शहराच्या तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत ही उष्णता अधिक जाणवण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी