Exam News : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल

नागपूर : एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरु होते. अशात राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाच्या चटक्यांना सामोरे जात विद्यार्थी शाळेत जात आहेत. वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेऊन न्यायालयाने शाळांना १५ एप्रिल पूर्वी परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेस परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने या वर्षी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार आहे. मात्र राज्यातील तापमानाचा पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. तापमानाची नोंद लक्षात घेता विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यां दिले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रक ठरवावे अशी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने न्यायालयाच्या निर्देशांचा स्वागत करत विदर्भातील शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय करून विदर्भातील शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात सुधारणा करावी अशी मागणी केली आहे. विदर्भातील तीव्र ऊन आणि वाढलेले तापमान लक्षात घेता १५ एप्रिल पूर्वी विदर्भातील शाळांच्या परीक्षा घेण्यात याव्या अशी मागणी ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे.

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली