Mumbai Climate : मुंबईत एप्रिलमध्येच मे-जूनची झळ; ठाणे ४० तर मुंबईत उष्णतेचा तडाखा

मुंबई : एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई आणि उपनगरांमध्ये उन्हाने अक्षरशः कहर केला आहे. सोमवारी मुंबईतील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचले तर ठाण्यात पारा थेट ४० अंशांवर गेला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला आहे.


मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) बहुतांश भागांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून, मुंबई शहराचाही पारा ३६ अंशांवर स्थिरावल्याचे नोंदवण्यात आले आहे. रविवारीच्या तुलनेत तापमानात २ अंशांची वाढ झाली असून ही वाढ पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे झाली आहे, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.



हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत तापमान ४० ते ४१ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून मात्र तापमानात थोडीशी घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र तोपर्यंत शहर उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखालीच राहणार आहे.


या उष्णतेच्या लाटेची सुरुवात फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच झाली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला तापमान ३५ अंशांपर्यंत स्थिर होते. मात्र गेल्या आठवड्यापासून आकाशातील मळभ दूर झाल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम जाणवू लागला आहे. त्यातच समुद्रकाठावरील आर्द्रतेमधील चढउतार आणि समुद्री वाऱ्यांचा अभाव यामुळे मुंबईकरांची तगमग वाढली आहे.


याचवेळी गुजरातमधून वायव्य दिशेने येणाऱ्या गरम वाऱ्यांनीही परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे. या गरम वाऱ्यांचा प्रवाह मुंबईकडे वळला असून, त्यामुळे शहराच्या तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत ही उष्णता अधिक जाणवण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

BEST ACCIDENT : मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा थरार, कांदिवलीत दोघांना चिरडले; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

MUMBAI : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. दादर येथील बस

Fire Station : चांदिवलीमध्ये अग्निशमन दलाची होणार उभारणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) चांदिवली (Chandiwali)  येथे नव्याने अग्निशमन केंद्र (Fire station) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या

BMC News : सखल भागांमध्ये अश्वशक्तीने महापालिका करणार प्रयत्न, साचलेले पाणी उचलून फेकणार

- मुंबईतील आठ ठिकाणी पुढील तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर पंपाची सुविधा - तब्बल १२३ कोटी रुपये करणार खर्च मुंबई (सचिन

BMC News : रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल १४ कंत्राटदारांची निवड, यंदा केवळ ४२ कोटींचीच कामे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे

Tree Plantation on Coastal Road : विस्तारीत कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात १७७८ झाडे बाधित, बदल्यात लावणार सुमारे १६ हजार झाडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई किनारी रस्ते प्रकल्प (उत्तर) वर्सोवा आंतरबदल ते दहिसर भाईंदर मार्गावरील दहिसर

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नव्या आरक्षण प्रणालीमुळे तिकीट बुकिंग होणार अधिक सोपं

मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांसाठी एक मोठं तांत्रिक अपग्रेड (Technological Upgrade) घेऊन येत आहे. तब्बल ४० वर्षांपासून