किल्ले रायगडच्या विकासासाठी ३५ कोटी

Share

राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरित करण्याचे निर्देश

अलिबाग : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी राज्य सरकारने केलेल्या आराखड्यास ६०६ कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी १९५.७० कोटींचा निधी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता ३५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.

२८ मार्च २०२३ रोजी एकूण मंजूर ६०६.०९ कोटीपैकी गेल्या दोन वर्षात २३०.७० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. मात्र, अद्याप ३६५. ३९ कोटी रुपयांचा नियोजित निधी रायगड किल्ला विकास योजनेस प्राप्त झालेला नाही. किल्ले रायगडच्या विकासासाठी सरकारने कंबर कसली आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून ३५ कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या निधीमधून पर्यटन विकासाची कामेही केली आणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकासासाठी ६०६.०९ कोटी रक्मेच्या आराखड्यास संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सदर आराखड्यासाठी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. सदर आराखडयातील कामांसाठी रायगडचे जिल्हाधिकारी यांना आतापर्यंत एकूण रक्कम १९५.७० कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. निधी जिल्हाधिकारी, रायगड यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मंजूर करण्यात आलेली रकम आहरण करून संबंधितांना वितरीत करण्यासाठी संबंधित सहायक जिल्हा नियोजन अधिकारी / जिल्हा नियोजन अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी व संबंधित जिल्हाधिकारी यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. नियंत्रण अधिकारी यांचा कोड ०००२८ असा आहे. सदर निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम त्यांनी संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात देयके सादर करून संबंधितांना वितरीत करण्यात यावे.

सदर कार्यवाहीबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करण्यात यावा. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हाधिकारी यांनी संदर्भाधीन क्र.९ अन्वये ५० कोटी इतका निधी वितरीत करण्याची विनंती केली आहे. तथापि या आराखड्यातील कामांसाठी सुधारित अंदाजानुसार प्राप्त झालेला ३५ कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब विचाराधीन होती.

Recent Posts

Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!

मुंबई  : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…

9 minutes ago

Electric Vehicles : महाराष्ट्र दिनापासून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

मुंबई  : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…

16 minutes ago

वेळेच्या नियोजनासाठी घड्याळाची गरज

रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…

29 minutes ago

Mumbai : पारंपारिक पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करा

मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…

32 minutes ago

MP Narayan Rane : ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी मा.खा. नारायण राणेंचा पुढाकार

मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…

34 minutes ago

ड्रोन कॅमेऱ्याने सुसज्ज दीदी

रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…

37 minutes ago