१८ जूनपासून पालखी सोहळ्याला सुरुवात, ६ जुलै रोजी पंढरपूरमध्ये होणार आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा

पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेली आषाढी वारी यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि संत तुकाराम महाराज (देहू) यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत.



आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा १९ जून २०२५ रोजी संजीवन समाधी मंदिरातून होणार आहे. तर देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान १८ जून २०२५ रोजी होईल. पालखी मार्गावर एकूण १७ मुक्काम असतील आणि ६ जुलै २०२५ रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.


यंदा माऊलींची पालखी २२ जून रोजी सासवडमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर २३ जूनला मुक्काम, आणि २४ जून रोजी सासवडहून पुढील प्रस्थान होणार आहे. आळंदी देवस्थानकडून संपूर्ण पालखी मार्गाचा आणि मुक्कामस्थळांचा आढावा घेतला जात आहे. सासवडमधील पालखी तळ, रस्त्याचे काम, व अन्य व्यवस्थांसाठी तयारीला वेग आला आहे.


सध्या फक्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या प्रस्थानाची तारीख समोर आली आहे. परंतु संपूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही.


Comments
Add Comment

महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला कायद्याचे कवच

विधानसभेत विशेष विधेयक; जमिनीची प्रत्यक्ष मालकी नसली तरी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा मुंबई (सुहास

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सियाचा व्हिडिओ व्हायरल

सिया-चेतनच्या कथित नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तपासाला नवे वळण? पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या

Vidhan Sabha : महत्त्वाच्या चर्चेवेळी अधिकाऱ्यांची दांडी, नगरविकास सचिवांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

मुंबई : मुंबईशी (Mumbai) संबंधित अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना, अधिकारी

Maharashtra Rain Alert : हवामान विभागाचा इशारा: राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढचे १०० तास महत्त्वाचे

पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दमदार पाऊस  मुंबई : पुणे वेधशाळेने ५ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रभर समाधानकारक ते

Nitesh Rane : मुंद्रा पोर्टच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – नितेश राणे

आधुनिक बंदर व्यवस्थापनाचा महाराष्ट्राला लाभ; करण अदानींसोबत नितेश राणेंची चर्चा News: मुंबई : महाराष्ट्राचे

Pankaja Munde : वाडी नगरपरिषदेचा एसटीपी प्रकल्प ३० ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील