Waqf Act : देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली: वक्फ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ आता कायदा बनल आहे. या नव्या कायद्याला काँग्रेस, एमआयएम आणि आम आदमी पक्ष यांनी विविध याचिकांसह सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. देशातील विविध राज्यांतील अनेक मुस्लिम संघटना याच्या विरोधात आंदोलने करत आहे. केंद्रसरकारच्या मते हा कायदा मुस्लिम विरोधी नाही आणि याचा उद्देश पक्षपात, वक्फच्या संपत्तीचा दुरूपयोग रोखणे आहे.



संसदेत किती मिळाली मते?


लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने २८८ मते तर विरोधात २३२ मते पडली होती. तर राज्यसभेत हे विधेयक सादर केल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने १२८ आणि विरोधात ९५ मते मिळाली होती.



वक्फ दुरुस्ती विधेयकावर शुक्रवारी सकाळी राज्यसभेत दीर्घकाळाच्या चर्चेनंतर संमत झाले होते. यात सत्ताधारी पक्ष आणि विरोघी पक्ष यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. राज्यसभेत या विधेयकावर १४ तास वाद झाला. अखेरीस या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली तर विरोधात ९५ मते मिळाली. यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. याआधी लोकसभेतही यावर १२ तास वादविवाद सुरू होती. त्यानंतर याला मंजूर करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयात चार याचिका दाखल


शनिवार याला कायद्यात लागू करण्याबाबत तसेच कार्यान्वित होण्यापासून रोखण्याच्या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयात २ आणखी याचिका दाखल करण्यात आल्या. एका याचिकेत दिल्लीत आम आदमी पक्षाचे आमदार आणि वक्फमध्ये घोटाळ्याचा आरोपी अमानतुल्लाह खान यांनी याचिका दाखल केली.
Comments
Add Comment

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.