Waqf Act : देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली: वक्फ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ आता कायदा बनल आहे. या नव्या कायद्याला काँग्रेस, एमआयएम आणि आम आदमी पक्ष यांनी विविध याचिकांसह सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. देशातील विविध राज्यांतील अनेक मुस्लिम संघटना याच्या विरोधात आंदोलने करत आहे. केंद्रसरकारच्या मते हा कायदा मुस्लिम विरोधी नाही आणि याचा उद्देश पक्षपात, वक्फच्या संपत्तीचा दुरूपयोग रोखणे आहे.



संसदेत किती मिळाली मते?


लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने २८८ मते तर विरोधात २३२ मते पडली होती. तर राज्यसभेत हे विधेयक सादर केल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने १२८ आणि विरोधात ९५ मते मिळाली होती.



वक्फ दुरुस्ती विधेयकावर शुक्रवारी सकाळी राज्यसभेत दीर्घकाळाच्या चर्चेनंतर संमत झाले होते. यात सत्ताधारी पक्ष आणि विरोघी पक्ष यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. राज्यसभेत या विधेयकावर १४ तास वाद झाला. अखेरीस या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली तर विरोधात ९५ मते मिळाली. यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. याआधी लोकसभेतही यावर १२ तास वादविवाद सुरू होती. त्यानंतर याला मंजूर करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयात चार याचिका दाखल


शनिवार याला कायद्यात लागू करण्याबाबत तसेच कार्यान्वित होण्यापासून रोखण्याच्या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयात २ आणखी याचिका दाखल करण्यात आल्या. एका याचिकेत दिल्लीत आम आदमी पक्षाचे आमदार आणि वक्फमध्ये घोटाळ्याचा आरोपी अमानतुल्लाह खान यांनी याचिका दाखल केली.
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला