SRH vs GT, IPL 2025: शुभमन गिलची जबरदस्त खेळी, गुजरातचा हैदराबादवर ७ विकेट राखून विजय

हैदराबाद: कर्णधार शुभमन गिलच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादवर ७ विकेट राखत दमदार विजय मिळवला आहे. हैदराबादने विजयासाठी दिलेले १५३ धावांचे आव्हान गुजरातने ७ विकेट राखत पूर्ण केले. सामन्यात आधी गोलंदाजीमध्ये सिराजने विकेटचा चौकार मारला त्यानंतर फलंदाजी कर्णधार शुभमन गिलने क्लास खेळी करत हैदराबादचा पराभव केला.


शुभमन गिलने नाबाद ६१ धावांची खेळी केली. तर त्याला सुंदर साथ लाभली ती वॉशिंग्टन सुंदरची. सुंदरने ४९ धावा केल्या. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. रुदरफोर्ड ३५ धावांवर नाबाद राहिला.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीत उतरलेल्या हैदराबादची सुरूवात खराब राहिली. पहिल्याच षटकांत सिराजने हैदराबादचा मजबूत फलंदाज ट्रेविस हेडला बाद केले. हेड ८ धावा करून बाद झाला. यानंतर ५व्या षटकांत अभिषेक शर्माही बाद झाला. त्याने १८ धावा केल्या. ईशन किशनकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र त्यालाही १७ धावाच करता आल्या.


पुढच्याच षटकांत नितीश रेड्डीही बाद झाला. शेवटच्या षटकांमध्ये पॅट कमिन्सने काही चांगले शॉट खेळले त्यामुळे हैदराबादला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या