सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

  62

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुडाळ शहर आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच बांदा शहराला तब्बल दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. जोरदार वाऱ्याने बांदा शहरात तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरची वाहतूक देखील विस्कळीत झाली.


अनेकांच्या दुकानांचे तसेच घरांचे पत्रे उडून गेलेत. मुसळधार पावसान सर्वांचीच तारांबळ उडाली. अवकाळी पवसाने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ पिकांचे मात्र नुकसान झालं आहे.

आज दुपारपासून ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणात उष्मा देखील वाढला होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वारे सुरु झालेत. काही वेळातच विजांच्या गडगडाटत मुसळधार पावसास सुरुवात झाली. जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने सर्वांनीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. तब्बल दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी