Shegaon Ram Navmi : रामनवमीनिमित्त 'गण गण गणात बोते'च्या गजरात शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी!

बुलढाणा : आज राम नवमी सोहळा (Ram Navmi 2025) असून राज्यासह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचे दिसत आहे. प्रभू राम जन्माच्या सोहळ्यासाठी अनेक देव-देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या (Gajanan Maharaj) मंदिर परिसरामध्ये देखील भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Shegaon)



संत गजानन महाराज शेगावात आले होते तेव्हा पासून शेगावात रामनवमीचा (Shegaon Ramnavmi) सण साजरा केल्या जातो. त्याचप्रमाणे यंदाही शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पाहायला मिळत आहे. 'गण गण गणात बोते'च्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्हयाच्या संत नगरी शेगावात रामनवमी चा  उत्सव निमित्त मोठी गर्दी उसळली आहे. संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले आहेत. तर शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावात दाखल झाल्या आहेत. सकाळी काकडा आरती झाली तर दुपारी श्री चां पालखी सोहळा असणार आहे.


दरम्यान, या कालावधीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानाकडून काल रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले आहे. आज सुद्धा मंदिर खुले असणार आहे. तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,