Shegaon Ram Navmi : रामनवमीनिमित्त 'गण गण गणात बोते'च्या गजरात शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी!

  41

बुलढाणा : आज राम नवमी सोहळा (Ram Navmi 2025) असून राज्यासह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचे दिसत आहे. प्रभू राम जन्माच्या सोहळ्यासाठी अनेक देव-देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या (Gajanan Maharaj) मंदिर परिसरामध्ये देखील भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Shegaon)



संत गजानन महाराज शेगावात आले होते तेव्हा पासून शेगावात रामनवमीचा (Shegaon Ramnavmi) सण साजरा केल्या जातो. त्याचप्रमाणे यंदाही शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पाहायला मिळत आहे. 'गण गण गणात बोते'च्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्हयाच्या संत नगरी शेगावात रामनवमी चा  उत्सव निमित्त मोठी गर्दी उसळली आहे. संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले आहेत. तर शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावात दाखल झाल्या आहेत. सकाळी काकडा आरती झाली तर दुपारी श्री चां पालखी सोहळा असणार आहे.


दरम्यान, या कालावधीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानाकडून काल रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले आहे. आज सुद्धा मंदिर खुले असणार आहे. तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या