Crime : रेल्वे अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याचा गैरवापर करुन गब्बर झालेल्या चहावाल्याला अटक

मुंबई : रेल्वे अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याचा गैरवापर करुन गब्बर झालेल्या चहावाल्याला अटक करण्यात आली. ही कारवाई दक्षता विभागाच्या निरीक्षकांच्या निर्देशांनंतर केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या कँटीनमध्ये कार्यरत चहावाल्याने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याप्रमाणे हुबेहूब असे बनावट सही शिक्के तयार करुन घेतले आणि त्यांचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.



रेल्वेचे तिकीट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन घेण्यासाठी चहावाला प्रवाशांना मोठी रक्कम आकारत होता. स्वतःकडे असलेल्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करुन तो तिकीट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन देत होता. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू होता. यासाठी चहावाल्या रवींद्र कुमार साहूने विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता अशा पदांवरील अधिकाऱ्यांचे बनावट सही शिक्के तयार करून घेतले होते.



साहूने बनावट सही शिक्के वापरुन रेल्वेचे तिकीट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन देत दरमहा दीड ते दोन लाख रुपयांची कमाई सुरू केली होती. मागील काही महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरू होता. रेल्वे कोट्याचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर दक्षता विभागाने तपास सुरू केला. मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाचे मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा आणि आर. एस. गुप्ता यांचे पथक कोलकाता मेलमधील तिकीटधारकांची तपासणी करत होते. यावेळी काही प्रवाशांनी आम्ही अधिक पैसे देऊन कन्फर्म तिकीट घेतल्याचे सांगितले. दक्षता अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करत चौकशी सुरू केली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या कँटीनमध्ये कार्यरत चहावाला रवींद्र कुमार साहू हा व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले.



साहूने मागील तीन महिन्यांपासून दररोज पाच ते सहा तिकिटे व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन दिल्याची कबुली दिली आहे. पण मागील किमान दोन वर्षांपासून व्हीआयपी कोट्याच गैरवापर सुरू असल्याचा संशय रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. या प्रकरणी साहूची चौकशी सुरू आहे.
Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी