Mumbai News : पोलीस निरीक्षकांकडून सायबर गुन्हे प्रतिबंध, महिला व बाल लैंगिक अत्याचाराविषयी जनजागृती अभियान!

मुंबई : ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विजय माडये (गुन्हे) यांनी नुकतेच पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील, यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे प्रकटीकरण पथकांच्या अन्य अधिकाऱ्यांच्या साथीने अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यातील एक गुन्हा अत्यंत महत्वाचा असून गुन्ह्यात चोरलेले ५९ मोबाईल त्यांची अंदाजे किंमत ३ लाख १५ हजार रुपये हस्तगत करून मिळवलेले आहेत.



मागील काही दिवसात चैन स्न्याचींग आणि मोबाईल चोरीच्या घटना अंधेरी ओशिवरा आणि मुंबईत वाढलेल्या असताना त्यावर ताबा मिळवणे आणि गुन्हेगारांना पकडणे पोलिसांसाठी एक आव्हान ठरत होते अशा प्रसंगी आरोपींना पकडण्या साठी लोकांची सुद्धा साथ मिळावी म्हणून पोलीस आणि सर्वसामान्य जनता यातील नाते घट्ट करण्याची गरज होती हे ओळखून पोलीस अधिकारी विजय माडये यांनी रायगड मिलिटरी शाळेमध्ये आयोजित स्नेह संमेलन आणि विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रमांत ५०० ते ६०० विद्यार्थी आणि हजारो पालकांना प्रत्यक्ष सायबर गुन्हे कसे घडतात आणि आपण ते कसे रोकु शकतो तसेच महिला व बाल लैंगिक अत्याचार आणि त्याला प्रतिबंध कसा आणु शकतो त्याच प्रमाणे जेष्ठ नागरिकांवरील हल्ले सामाजिक सलोखा व इतर गुन्हे बाबत प्रतिबंध करण्यासंदर्भात जनजागृती केली.


पोलिसांच्या तातडीच्या सेवा मिळवण्यासाठी १००.१०१.१०२.१०३,१०४ क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले याव्यतिरिक्त ओशिवरा पोलीस ठाणेतील हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी ओरिएंटल कॉलेज, एच के कॉलेज ऑफ फार्माशी, सिटी इंटरनॅशनल स्कूल, तसेच रामजन्म कथा महोत्सव या व अशा ठिकाणीसुद्धा नागरिकांना अशाच पद्धतीचे योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होत असून नागरिक आरोपी विरोधात तक्रात करायला पुढे येत आहेत, त्याच प्रमाणे लैंगिक अपराधा संदर्भातील शंभर टक्के गुन्हे पोलीस अधिकाऱ्यानी अहोरात्र मेहनत करून आणि जीवाची परवा न करता उघडकीस आणल्याची माहिती पोलीस अधिकारी विजय माडये यांनी दिली आहे .

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या