Mumbai News : पोलीस निरीक्षकांकडून सायबर गुन्हे प्रतिबंध, महिला व बाल लैंगिक अत्याचाराविषयी जनजागृती अभियान!

मुंबई : ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विजय माडये (गुन्हे) यांनी नुकतेच पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील, यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे प्रकटीकरण पथकांच्या अन्य अधिकाऱ्यांच्या साथीने अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यातील एक गुन्हा अत्यंत महत्वाचा असून गुन्ह्यात चोरलेले ५९ मोबाईल त्यांची अंदाजे किंमत ३ लाख १५ हजार रुपये हस्तगत करून मिळवलेले आहेत.



मागील काही दिवसात चैन स्न्याचींग आणि मोबाईल चोरीच्या घटना अंधेरी ओशिवरा आणि मुंबईत वाढलेल्या असताना त्यावर ताबा मिळवणे आणि गुन्हेगारांना पकडणे पोलिसांसाठी एक आव्हान ठरत होते अशा प्रसंगी आरोपींना पकडण्या साठी लोकांची सुद्धा साथ मिळावी म्हणून पोलीस आणि सर्वसामान्य जनता यातील नाते घट्ट करण्याची गरज होती हे ओळखून पोलीस अधिकारी विजय माडये यांनी रायगड मिलिटरी शाळेमध्ये आयोजित स्नेह संमेलन आणि विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रमांत ५०० ते ६०० विद्यार्थी आणि हजारो पालकांना प्रत्यक्ष सायबर गुन्हे कसे घडतात आणि आपण ते कसे रोकु शकतो तसेच महिला व बाल लैंगिक अत्याचार आणि त्याला प्रतिबंध कसा आणु शकतो त्याच प्रमाणे जेष्ठ नागरिकांवरील हल्ले सामाजिक सलोखा व इतर गुन्हे बाबत प्रतिबंध करण्यासंदर्भात जनजागृती केली.


पोलिसांच्या तातडीच्या सेवा मिळवण्यासाठी १००.१०१.१०२.१०३,१०४ क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले याव्यतिरिक्त ओशिवरा पोलीस ठाणेतील हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी ओरिएंटल कॉलेज, एच के कॉलेज ऑफ फार्माशी, सिटी इंटरनॅशनल स्कूल, तसेच रामजन्म कथा महोत्सव या व अशा ठिकाणीसुद्धा नागरिकांना अशाच पद्धतीचे योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होत असून नागरिक आरोपी विरोधात तक्रात करायला पुढे येत आहेत, त्याच प्रमाणे लैंगिक अपराधा संदर्भातील शंभर टक्के गुन्हे पोलीस अधिकाऱ्यानी अहोरात्र मेहनत करून आणि जीवाची परवा न करता उघडकीस आणल्याची माहिती पोलीस अधिकारी विजय माडये यांनी दिली आहे .

Comments
Add Comment

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता