Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी

नवी दिल्ली: वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. रात्री उशिरा दोन वाजण्याच्या सुमारास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. विधेयकाच्या बाजूने २८८ मते मिळाली तर त्याच्या विरोधात २३२ मते मिळाली. आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल.


भाजपचे सहकारी पक्षांनी या विधेयकाला खुलेपणाने समर्थन दिले तर विरोधी पक्षाने या विधेयकाला विरोध केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की अल्पसंख्यांकासाठी भारतापेक्षा सुरक्षित जागा जगात कुठेही नाही आणि ते सुरक्षित आहेत. कारण बहुसंख्यांक पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहेत.


वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ वर साधारण १२ तास चर्चा सुरू होती. १२ तासाच्या चर्चेनंतर या विधेयकाला अखेर मंजुरी मिळाली. आता या विधेयकावर आज म्हणजेच गुरूवारी राज्यसभेत चर्चा होईल. वरिष्ठ सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर वक्फ दुरुस्ती कायदा अस्तित्वात येण्यासाठीचा मार्ग मोकळा होईल.


सुधारित विधेयकानुसार वक्फ बोर्डात मुसलमानांसह चार बिगर मुसलमान सदस्य असतील. यातील दोन महिला असतील. तसेच जे किमान पाच वर्षे इस्लामचे पालन करतात त्यांनाच त्यांची मालमत्ता वक्फमध्ये हस्तांतरित करता येईल. यासोबतच त्यांनी हे देखील स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की हे विधेयक कोणाच्याही धार्मिक श्रद्धेत हस्तक्षेप करणारे नाही तर ते केवळ वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी आहे.
Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे