Weather : कुठे उष्णतेची लाट तर कुठे गारपीटीचा इशारा! पाहा कसे असेल आजचे हवामान

मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी (Rain Alert) कोसळ्याचे दिसून आले. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आजही देशभरात हवामानाचे दुहेरी स्वरूप दिसून येत आहे. हवामान विभागाकडून (IMD) एकीकडे मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे तीव्र उष्णतेचा (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे. (Weather Update)



हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रापासून कोमोरिन क्षेत्रातून कमी पातळीपर्यंत चक्राकार अभिसरणाच्या स्वरूपात वाऱ्यांचा उत्तर-दक्षिण प्रवाह सुरू आहे. यामुळे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे खालच्या पातळीवर एकमेकांवर आदळत आहेत. या हवामान गतिविधींमुळे, छत्तीसगड, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणाच्या विविध भागात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहेच्या वेगवेगळ्या भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.


तर मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे या भागातील उभ्या गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, ओडिशा, कोकण आणि गोवा, कर्नाटकचा किनारी भाग, पश्चिम बंगालमधील गंगेचे मैदान, गुजरातच्या विविध भागात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Update)



उत्तर भारतात तापमान दोन ते तीन अंशांनी वाढेल


गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात हवामानाचा पारा वाडत असल्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पारा आणखी वाढू शकतो आणि तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होऊ शकते. यामुळे उत्तर भारतातील बहुतेक भागात पुढील चार ते पाच दिवसांत पारा ४० अंशांच्या पुढे जाऊ शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे.



राजस्थानमध्ये पसरणार उष्णतेची लाट


राजस्थानमध्ये हवामानाचा पाराने उच्चांक गाठला असून ५ ते ७ एप्रिल दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये उष्ण वाऱ्यांसह उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, ३ आणि ४ एप्रिल रोजी, ईशान्येकडील बहुतेक भागात उष्ण आणि दमट हवामानाचा लोकांना नाहक त्रास होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी