Pandharpur News : पंढरपुरात नॉनव्हेज विक्रीवर बंदी!

Share

चैत्री यात्रेनिमित्त प्रशासनाचा निर्णय

सोलापूर : पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur News) ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा चैत्र शुद्ध एकादशी (चैत्र महिन्यातील शुद्ध एकादशी) दिवशी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. चैत्र महिना हा हिंदू पंचांगानुसार नववर्षाचा प्रारंभ दर्शवतो, त्यामुळे या महिन्यातील एकादशीचा विशेष महिमा आहे. पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur Chaitri Yatra) ही भक्तीचा एक पवित्र सोहळा असून, महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे दर्शन घडवणारी यात्रा आहे. भक्तगण टाळ-मृदंगाच्या गजरात विठोबाच्या चरणी लीन होऊन अध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पंढरपुरात येत्या ८ एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरणार आहे.या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ७ ते ९ एप्रिल दरम्यान ही बंदी असणार आहे. चैत्री यात्रेच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्री करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. याशिवाय मंदिर परिसरात नारळ विक्री आणि फोडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.

पंढरपुरातील उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रेच्या निमित्ताने हे आदेश काढले आहेत. सध्या प्रशासनाकडून चैत्री यात्रेची पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. तसेच चैत्री यात्रेनिमित्त पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Recent Posts

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…

43 minutes ago

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…

2 hours ago

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…

2 hours ago

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…

3 hours ago

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…

4 hours ago

अतिरेक्यांशी झुंजताना दोन महिन्यांत सहा जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…

4 hours ago