Pandharpur News : पंढरपुरात नॉनव्हेज विक्रीवर बंदी!

चैत्री यात्रेनिमित्त प्रशासनाचा निर्णय


सोलापूर : पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur News) ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा चैत्र शुद्ध एकादशी (चैत्र महिन्यातील शुद्ध एकादशी) दिवशी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. चैत्र महिना हा हिंदू पंचांगानुसार नववर्षाचा प्रारंभ दर्शवतो, त्यामुळे या महिन्यातील एकादशीचा विशेष महिमा आहे. पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur Chaitri Yatra) ही भक्तीचा एक पवित्र सोहळा असून, महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे दर्शन घडवणारी यात्रा आहे. भक्तगण टाळ-मृदंगाच्या गजरात विठोबाच्या चरणी लीन होऊन अध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.



पंढरपुरात येत्या ८ एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरणार आहे.या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ७ ते ९ एप्रिल दरम्यान ही बंदी असणार आहे. चैत्री यात्रेच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्री करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. याशिवाय मंदिर परिसरात नारळ विक्री आणि फोडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.


पंढरपुरातील उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रेच्या निमित्ताने हे आदेश काढले आहेत. सध्या प्रशासनाकडून चैत्री यात्रेची पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. तसेच चैत्री यात्रेनिमित्त पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे