Pandharpur News : पंढरपुरात नॉनव्हेज विक्रीवर बंदी!

चैत्री यात्रेनिमित्त प्रशासनाचा निर्णय


सोलापूर : पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur News) ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा चैत्र शुद्ध एकादशी (चैत्र महिन्यातील शुद्ध एकादशी) दिवशी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. चैत्र महिना हा हिंदू पंचांगानुसार नववर्षाचा प्रारंभ दर्शवतो, त्यामुळे या महिन्यातील एकादशीचा विशेष महिमा आहे. पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur Chaitri Yatra) ही भक्तीचा एक पवित्र सोहळा असून, महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे दर्शन घडवणारी यात्रा आहे. भक्तगण टाळ-मृदंगाच्या गजरात विठोबाच्या चरणी लीन होऊन अध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.



पंढरपुरात येत्या ८ एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरणार आहे.या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ७ ते ९ एप्रिल दरम्यान ही बंदी असणार आहे. चैत्री यात्रेच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्री करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. याशिवाय मंदिर परिसरात नारळ विक्री आणि फोडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.


पंढरपुरातील उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रेच्या निमित्ताने हे आदेश काढले आहेत. सध्या प्रशासनाकडून चैत्री यात्रेची पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. तसेच चैत्री यात्रेनिमित्त पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी