Pandharpur News : पंढरपुरात नॉनव्हेज विक्रीवर बंदी!

चैत्री यात्रेनिमित्त प्रशासनाचा निर्णय


सोलापूर : पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur News) ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा चैत्र शुद्ध एकादशी (चैत्र महिन्यातील शुद्ध एकादशी) दिवशी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. चैत्र महिना हा हिंदू पंचांगानुसार नववर्षाचा प्रारंभ दर्शवतो, त्यामुळे या महिन्यातील एकादशीचा विशेष महिमा आहे. पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur Chaitri Yatra) ही भक्तीचा एक पवित्र सोहळा असून, महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे दर्शन घडवणारी यात्रा आहे. भक्तगण टाळ-मृदंगाच्या गजरात विठोबाच्या चरणी लीन होऊन अध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.



पंढरपुरात येत्या ८ एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरणार आहे.या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ७ ते ९ एप्रिल दरम्यान ही बंदी असणार आहे. चैत्री यात्रेच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मांस आणि मटण विक्री करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. याशिवाय मंदिर परिसरात नारळ विक्री आणि फोडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.


पंढरपुरातील उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रेच्या निमित्ताने हे आदेश काढले आहेत. सध्या प्रशासनाकडून चैत्री यात्रेची पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. तसेच चैत्री यात्रेनिमित्त पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Comments
Add Comment

प्रशासनाचा भोंगळ कारभार! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील दोन मृत

भारतात वर्षभरात १६६ वाघांचा मृत्यू

३१ बछड्यांचा समावेश नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या

राज्यात थंडी वाढणार! काही ठिकाणी तुरळक पावसाचाही अंदाज

मुंबई: नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. १ जानेवारीला कोकणात

महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती!

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : ‘महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्ती आहे’,

बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आमदार शरद सोनावणे आणि