Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबई क्रिकेट सोडून गोव्याला जाणार

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) वैयक्तिक कारणांमुळे मुंबई क्रिकेट संघ सोडून गोवा संघात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (१ एप्रिल २०२५) त्यांने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहून 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' (NOC) मागितले, जे MCA ने मंजूर केले आहे.


या निर्णयामुळे २३ वर्षीय डावखुरा फलंदाज २०२५-२६ हंगामापासून गोव्याकडून खेळेल. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांबा देसाई यांनी पुष्टी केली की जयस्वाल पुढील हंगामापासून गोव्याकडून खेळणार आणि राष्ट्रीय कर्तव्यांपासून मोकळा असताना तो संघाचे नेतृत्वही करू शकतो.



जयस्वालने अखेरचा सामना मुंबईकडून २३-२५ जानेवारी दरम्यान जम्मू आणि काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफी ग्रुप अ लीग फेरीच्या सामन्यात जानेवारी २०२५ मध्ये खेळला होता. बीसीसीआयने सर्व भारतीय खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळावे या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी केल्यानंतर जयस्वालने शेवटचा सामना खेळला होता.


त्या सामन्यात, जयस्वालने रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामात एकमेव खेळ केला होता, त्याने ४ आणि २६ धावा केल्या होत्या या वेळी दुसऱ्यांदा मुंबईचा जम्मू आणि काश्मीरकडून पाच विकेट्सने पराभव झाला होता.


जयस्वालचा हा निर्णय मुंबई क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे, कारण तो अलिकडच्या काळात गोव्यात स्थलांतरित होणारा अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड यांच्यानंतर तिसरा प्रमुख खेळाडू आहे.

Comments
Add Comment

Vaishali Rameshbabu : आर. वैशालीचा ऐतिहासिक पराक्रम! ठरली कॅन्डिडेट्स जिंकणारी पहिली भारतीय महिला

मुंबई : भारतीय बुद्धिबळपटू आर. वैशाली (R Vaishali) हिने इतिहास रचत सायप्रसमध्ये झालेली फिडे महिला कॅन्डिडेट्स

IPL 2026 CSK vs KKR : चेन्नईचा चेपॉकवर दबदबा! चेन्नईचा कोलकातावर ३२ धावांनी विजय

मुंबई : आयपीएलच्या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय मिळवत स्पर्धेत आपली

IPL 2026 SRH vs RR : विदर्भाच्या प्रफुल हिंगेचा कहर; राजस्थानचा विजयरथ रोखण्यात हैद्राबाद यशस्वी

सोमवार १३ एप्रिल रोजी हैद्राबाद आणि राजस्थान (IPL 2026 SRH vs RR) यांच्यात झालेल्या सामन्यात, हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर

Pandya Brothers : पंड्या ब्रदर्समध्ये फूट की संघासाठी एकनिष्ठता ? त्या दिवशी मैदानात नक्की घडल काय?

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर १२ एप्रिल रोजी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा १८

Hardik Pandya : मुंबईच्या पराभवाची हॅट्रिक; हार्दिक पंड्याच्या कॅप्टनशीवर दिग्गज खेळाडूंसह चहुबाजुंनी टीका

मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई

IPL 2026 MI vs RCB : वानखेडेवर RCBचा जल्लोष तर मुंबई इंडियन्सने केली पराभवाची 'हॅट्रिक'

मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई