BJP President : कधी ठरणार भाजपाध्यक्ष ? लोकसभेतही झाली चर्चा

नवी दिल्ली : लोकसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी अचानक भाजपाध्यक्ष या पदाकडे थोड्या वेळासाठी चर्चा वळवली. जो स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सांगतो त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष अद्याप ठरलेला नाही. हे कसे ? असा प्रश्न अखिलेश यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगेच उत्तर दिले.



लोकसभेत असलेल्या इतर मोठ्या पक्षांचे अध्यक्ष हे पक्षाच्या पातळीवर चार पाच वरिष्ठ नेते ठरवतात. हे नेते प्रामुख्याने एकाच कुटुंबाशी संबंधित असतात. या उलट भारतीय जनता पार्टीत काही कोटी सदस्य आहेत. यातील किमान बारा - तेरा कोटी सदस्य पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत वेगवेगळ्या टप्प्यांशी संबंधित आहेत. यामुळे प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. पण लवकरच भाजपाध्यक्ष निवडला जाईल; असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.



अखिलेश यादव अध्यक्ष म्हणून २५ वर्षे समाजवादी पक्षाचे नेतृत्व करू शकतात. भारतीय जनता पार्टीचे तसे नाही. या पक्षात नेता निवड ही विविध घटकांवर अवलंबून असल्यामुळे वेळ लागत असल्याचे अमित शाह म्हणाले. त्यांनी लवकरच भाजपाध्यक्ष जाहीर होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने