लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट

बीड : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते.यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्या दरम्यान एक मोठं आणि सूचक वक्तव्य केलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमा दरम्यान तरुणांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेबाबत मोठं विधान केले आहे. ते म्हणाले, लाडक्या बहिणीला आपण १५०० रुपये देतोय, परंतू राज्याची आर्थिक परिस्थिती काळानुरूप सुधारेल तेव्हा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना २१०० रूपये देण्याचा विचार करू, असं म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आश्वस्त केल्याचे पाहायला मिळाले.



पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना २१०० नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणाऱ्या या योजनेतील लाडक्या बहिणींना १५०० रूपयांचे २१०० रूपये मिळण्यासाठी अजून वाट पाहवी लागणार असल्याचे चित्र दिसतेय.
Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ