Firing on LOC : भारताने हाणून पाडला पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न

पुँछ : पाकिस्तानने पुँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी परिसरात नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न केला. पण भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला.



पाकिस्तानमधून घुसखोरीचा प्रयत्न करत असलेल्यांपैकी एकाचा पाय पडल्यामुळे भूसुरुंगाचा स्फोट झाला. यानंतर भारताच्या सैनिकांनी घुसखोरांवर तसेच त्यांची मदत करत असलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांवर तुफान गोळीबार केला. भारताकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले आणि पाकिस्तानने एकदम माघार घेतली.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ चार ते पाच घुसखोर आणि तेवढेच पाकिस्तानचे सैनिक ठार झाले. पाकिस्तानचे किमान दोन ते तीन सैनिक भारताच्या गोळीबारात जखमी झाले. भारतीय सैन्याची जीवितहानी झालेली नाही. पाकिस्तानने माघार घेतली तरी नियंत्रण रेषेवर अधूनमधून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. सध्या कृष्णा घाटी परिसरात भारतीय सैनिक हाय अलर्टवर आहेत.

कथुआ खोऱ्यात काही अतिरेक्यांनी स्थानिकांच्या मदतीने घुसखोरी केली आहे. या अतिरेक्यांच्या विरोधात घनदाट जंगलात भारतीय सैन्याची विशेष मोहीम सुरू आहे. अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना शोधून त्यांच्या विरोधातही कारवाई सुरू आहे. भारतीय सैन्याने घनदाट जंगलात लपलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी आधुनिक टेहळणी उपकरणांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने