Thane News : घोडबंदर रोड, फाऊंटन जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार!

ठाण्यातून वसईला बोगद्यातून जाता येणार; एमएमआरडीएचा मास्टर प्लान तयार


मुंबई : घोडबंदर रोड आणि फाउंटन जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. मात्र लवकरच या दोन ठिकाणावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाने (एमएमआरडीए) यासाठी मास्टर प्लान तयार केला आहे. एमएमआरडीने अलीकडेच अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अनेक प्रकल्पाची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. यावेळी ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन पर्यंताच्या भुयारी मार्गाचा अर्थसंकल्पात समावेश केले आहे.



घोडबंदर रोड येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. अनेकदा ३० ते ४० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त फाउंटन जंक्शन येथून वसईला जाता येते. या समस्येवर मात करण्यासाठी एमएमआरडीए ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंत भुयारी मार्ग बांधणार आहे. या प्रकल्पासाठी १,२०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.


घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंतचा रस्ता सध्या चौपदरी आहे. ठाणे शहर आणि राष्ट्रीय महामार्ग विभागांना जोडल्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथे उन्नत मार्ग व्हावा, अशी मागणी कित्येत दिवस होत होती. गायमुख ते फाऊंटन हॉटेल या प्रकल्पात दोन स्वतंत्र भुयारी बोगदे निर्माण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे ठाण्यावरून वसई-विरार तसेच भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.


गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शनबोरबरच भाईंदर ते फाऊंटन हॉटेलपर्यंतही भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळे गायमुख ते वसई भुयारी मार्गाने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता येणार आहे. फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बांधण्यासाठी १,०००.०० कोटींचा खर्च येणार आहे. ठाणे घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदरपर्यंत उन्नत रस्त्याचे डिझाइन आणि बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी