बुलढाण्यामध्ये तीन वाहनांचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

बुलढाणा:  बुलढाणा जिल्ह्यात खासगी बस, बोलेरो आणि एसटी बस या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे.  शेगाव-खामगाव महामार्गावर झालेल्या या अपघातात पाच जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

पहाटे साडे पाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव वेगात असलेली बोलेरो कार एसटी बसवर धडकली.  यानंतर पाठीमागून येत असलेल्या खाजगी प्रवासी बसने या अपघातग्रस्त गाड्यांना धडक दिली. 

या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर २४ जण यात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. जखमी झालेल्यांवर खामगाव येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, वेगात असलेली बोलेरो शेगाव येथून कोल्हापुरच्या दिशेने जात होती.  तर एसटी महामंडळाची बस पुणे येथून परतवाडाच्या दिशेने जात होती. या दोन वाहनांची धडक झाली. त्यातच एक खाजगी बस या दोन गाड्यांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की ५ जण यात मृत्यूमुखी पडले तर २४ जण जखमी झालेत. 
Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व