Maruti ची गाडी खरेदीचा विचार करताय? तर आधी हे ज़रूर वाचा…

  58

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या गाड्यांच्या पोर्टफोलिओच्या किंमती अपडेच करण्याची घोषणा केली आहे. हे वर्षात तिसऱ्यांदा घडत आहे की कंपनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करत आहे. कंपनीने आगामी ८ एप्रिल २०२५ पासून आपल्या अनेक कार मॉडेलच्या किंमतीमध्ये वाढीची घोषणा केली आहे.  मारूती वॅगन आर पासून ते ग्राँड व्हिटारापर्यंत सर्व मॉडेलच्या किंमतीमध्ये २५०० रूपयांपासून ते ६२ हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे. 

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या विविध मॉडेलसाठी येणारा खर्च तसेच ऑपरेशनल खर्चामुळे गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करणे गरजेचे झाले. इनपुट कॉस्ट आणि कच्च्या मालाच्या किंमतीमुळे ही वाढ केल्याचे सांगितले जात आहे. 

किती वाढणार किंमत?


मारुती सुझुकीच्या माहितीनुसार, किंमतीमधील वाढ ही विविध मॉडेलवर अवलंबून असणार आहे. कंपनीची प्रसिद्ध एसयूव्ही ग्रँड व्हिटाराच्या किंमतीत ६२ हजार रूपयांपर्यंत वाढ होईल. तर कंपनीची स्वस्त व्हॅन मारुती इकोमध्ये २२ ५०० रूपयांची वाढ होईल.  मारूतीच्या वॅगन आरच्या किंमतीत १४ हजार रूपयांपर्यंत वाढ केली जाईल.  याशिवाय मल्टी पर्पज व्हेईकल एक्सएल६ आणि अर्टिगा यांच्या किंमती १२५०० रूपयांपर्यंत वाढतील. 

भारतीयांची आवडती कार Wagon R…


गेल्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकी वॅगनआर देशातील सर्वाधिक विक्रीची कार ठरली आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात या कारच्या १,९८,४५१ युनिटची विक्री केली. कंपनीचा दावा आहे की गेल्या चार आर्थिक वर्षांपासून ही कार सातत्याने बेस्ट सेलिंग कार ठरत आहे. 
Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत