Maruti ची गाडी खरेदीचा विचार करताय? तर आधी हे ज़रूर वाचा…

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या गाड्यांच्या पोर्टफोलिओच्या किंमती अपडेच करण्याची घोषणा केली आहे. हे वर्षात तिसऱ्यांदा घडत आहे की कंपनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करत आहे. कंपनीने आगामी ८ एप्रिल २०२५ पासून आपल्या अनेक कार मॉडेलच्या किंमतीमध्ये वाढीची घोषणा केली आहे.  मारूती वॅगन आर पासून ते ग्राँड व्हिटारापर्यंत सर्व मॉडेलच्या किंमतीमध्ये २५०० रूपयांपासून ते ६२ हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे. 

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या विविध मॉडेलसाठी येणारा खर्च तसेच ऑपरेशनल खर्चामुळे गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करणे गरजेचे झाले. इनपुट कॉस्ट आणि कच्च्या मालाच्या किंमतीमुळे ही वाढ केल्याचे सांगितले जात आहे. 

किती वाढणार किंमत?


मारुती सुझुकीच्या माहितीनुसार, किंमतीमधील वाढ ही विविध मॉडेलवर अवलंबून असणार आहे. कंपनीची प्रसिद्ध एसयूव्ही ग्रँड व्हिटाराच्या किंमतीत ६२ हजार रूपयांपर्यंत वाढ होईल. तर कंपनीची स्वस्त व्हॅन मारुती इकोमध्ये २२ ५०० रूपयांची वाढ होईल.  मारूतीच्या वॅगन आरच्या किंमतीत १४ हजार रूपयांपर्यंत वाढ केली जाईल.  याशिवाय मल्टी पर्पज व्हेईकल एक्सएल६ आणि अर्टिगा यांच्या किंमती १२५०० रूपयांपर्यंत वाढतील. 

भारतीयांची आवडती कार Wagon R…


गेल्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकी वॅगनआर देशातील सर्वाधिक विक्रीची कार ठरली आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात या कारच्या १,९८,४५१ युनिटची विक्री केली. कंपनीचा दावा आहे की गेल्या चार आर्थिक वर्षांपासून ही कार सातत्याने बेस्ट सेलिंग कार ठरत आहे. 
Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील